आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील जेवळीसह अनेक गावातील सर्वसामान्य नागरिकांना महावितरणकडून आव्वाचे सव्वा वीज बिल आकारले जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. त्यामुळे सुरळीत बिल आकारावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने बुधवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. दिलेल्या निवेदनात म्हटले की, तालुक्यातील जेवळीसह अनेक गावातील सर्वसामान्य नागरिकांना वीज वितरण कार्यालयाकडून आव्वाचे सव्वा बिल आकारले जात आहेत. अत्यंत गरीब कुटुंबातील नागरिकांना घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वापर नाही. दोनच व्यक्ती असताना लाखाच्या वर बिले दिले जात आहे. तसेच बिल भरणा न केल्यास वीज वितरण कार्यालयाकडून विद्युत कनेक्शन बंद केले जाते.
कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता विद्युत कनेक्शन तोडले जाते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याने यावर आळा घालावा. अन्यथा तीव्र आंदोलन करीत कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा या देण्यात आला. सुरळीत देय रक्कम आकारणी करावी व जादा बिले आलेल्या नागरिकांना सुरळीत बिल आकारणी करून भरणा करून घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे धाराशिव जिल्हा संघटक धनराज बिराजदार, लोहारा शहराध्यक्ष पद्माकर चव्हाण, लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी यादव व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.