आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२०२२ मध्ये सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेले अनुदान शेतकऱ्यांना द्यावे, हरभरा खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावीत, कांद्याला प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली ढोकी येथील साखर कारखाना चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक संकटात मागील दोन वर्षांपासून अडकले आहेत.
शासनाने वेळोवेळी केलेल्या मागण्यांसंदर्भात ठोस कारवाई केली नाही, यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दुधगावकर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी मोर्चात सहभागी झाले. काही वेळातच रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी राहिली. पोलिस प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपासून या परिसरातील गावांमध्ये पोलिस पाटलांच्या माध्यमातून आंदोलनात कोणीही सहभागी होऊ नये. जर सहभागी झालात किंवा होण्यासाठी गेला तर तुमच्यावर पोलिस कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम दिला गेला, शेतकऱ्यांना भयभीत करण्यासाठी जमावबंदी लागू केली, असा आरोप दुधगावकरांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.