आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा उस्मानाबाद-तुळजापूर- सोलापूर रेल्वेसाठी केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात ११० कोटी रुपये देण्याचा निर्णय व राज्य सरकारचा ४५२.५६ कोटींचा निर्णय खासदारांना पैशाचा पाऊस अन् पहिलाच चेक बाऊन्स आणि आमदारांना लबाडाचे आवतन वाटत असेल तर खासदार-आमदारांनी ठाकरे-पवार सरकारच्या काळात जिल्ह्यात किती आणि कोणती विकासकामे करून पैशांचा पाऊस पाडला व कोणत्या योजनांच्या जेवणावळी उठवल्या, समाजातील कोणत्या लाभार्थी वर्गाने तृप्तीची ढेकर दिली हे जनतेला सांगावे, असा पलटवार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला आहे.ठाकरे सरकारपेक्षा मोदी यांचे मन कितीतरी मोठे आहे, असेही काळे यांनी म्हटले आहे.
नितीन काळे यांनी म्हटले अाहे की, तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वेच्या नकाशावर यावे, अशी मागणी १९६० पासून सुरू आहे. २००४ साली सोलापूर-तुळजापूर-उस् मानाबाद रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाली होती.२०१९ साली सोलापूर भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेमार्गासाठी सरकारने मंजुरी दिली असल्याचे जाहीर केले.
मात्र तत्कालीन राज्य सरकरच्या उदासिन धोरणामुळे व निधी अभावी भूसंपादन प्रक्रिया रेंगाळली होती. ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल परब यांनी तर ह्या रेल्वेमार्गाबाबत वेगळीच माहिती सभागृहात दिल्यामुळे आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्यावर हक्कभंगाची सूचना दिली होती. अखेर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ४५२.५६ कोटी रुपयांचा सहभाग कॅबीनेटच्या बैठकीत जाहीर केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.