आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ दावा:राज्याच्या अर्थसंकल्पाचा जिल्ह्याला होणार फायदा‎

धाराशिव‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा‎ अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून‎ शेतकरी, महिला, वंचित, समाजातील सर्व‎ घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा‎ जिल्ह्यालाही मोठा फायदा होणार आहे, असा‎ दावा भाजपचे प्रवक्ते किशोर शितोळे यांनी‎ केला.‎ पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष नितीन काळे,‎ माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अ‍ॅड.‎ खंडेराव चौरे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे,‎ माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, भाजपा युवा‎ मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर,‎ प्रदीप शिंदे उपस्थित होते.

शितोळे म्हणाले,‎ अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी दोन महिने‎ अगोदर जनतेकडून अपेक्षा व सूचना‎ मागवण्यात आल्या होत्या. अडीच हजार सूचना‎ प्राप्त झाल्या होत्या. खरीप व रब्बी हंगामातील‎ पीकविमा सरकार भरणार असून शेतकरी वाटा‎ फक्त एक रूपया असेल. मागेल त्याला‎ शेततळे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहान,‎ कडधान्यावर आधारित प्रकल्प, गोपीनाथ मुंडे‎ शेतकरी अपघात सानुग्रह योजना आता सरकारमार्फत राबवली‎ जाणार आहे. गो-सेवा संवर्धनासाठी तरतूद केली‎ आहे. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी एक हजार‎ कोटींची तरतूद केली.

मराठवाडा-कृष्णा सिंचन‎ प्रकल्पासाठी ११ हजार ६२६ कोटींची तरतूद,‎ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी‎ मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पासाठी तरतूद केली.‎ नवीन २७ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली.‎ सोलापूर-तुळजापूर-धार ाशिव रेल्वे मार्गासाठी‎ ४५० कोटी, धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालय बांधकामासाठी तरतूद केली आहे.‎ नवीन नागपूर-गोवा महामार्ग जिल्ह्यातून जाणार,‎ यासाठी मोठी तरतूद केली. याशिवाय‎ रिक्षाचालक-मालक, गुरव, रामोशी, वडार‎ समाजासाठी नवीन महामंडळे स्थापन केली‎ आहेत. पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद आहे.‎

बातम्या आणखी आहेत...