आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:महाविद्यालयातील अंतर्गत‎ वादात अनुदान अडकले‎

काक्रंबा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा‎ येथील छञपती संभाजीराजे शिक्षण‎ प्रसारक मंडळ संचलित मातोश्री‎ ञिवेणीबाई मोरे कनिष्ठ‎ महाविदयातील शिक्षक विरूद्‎ संचालक मंडळाच्या‎ पदधिका-याचा वर्षंभरा पासुन सुरू‎ असलेला अंतर्गत वादामुळे सदरील‎ २०% अनुदान अडकले असून गेल्या‎ दहा ते बारा वर्षांपासून विनावेतन‎ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सध्या‎ उपासमारीची वेळ आल्याने सदरील‎ संस्थेच्या कारभाराची चौकशी‎ करून न्याय द्यावा अन्यथा दि ६‎ रोजी जि.प.च्या माध्यमिक शिक्षण‎ कार्यालय समोर विद्यार्थीसह‎ सहकुटुंब उपोषण करण्याचा इशारा‎ कर्मचाऱ्यांनी शिक्षण उपसंचालक व‎ शिक्षण अधिकारी यांना निवेदन द्रारे‎ दिला आहे.‎

तालुक्यातील काक्रंबा येथील‎ शैक्षणिक क्षेत्रात नांवलैवकिक‎ असलेल्या छत्रपती संभाजीराजे‎ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित‎ मातोश्री ञिवेणीबाई मोरे कनिष्ठ‎ महाविदयात इयत्ता अकरावी‎ बारावीच्या वर्गात काक्रंबा गावासह‎ परिसरातील तब्बल ११४ मुलं मुली‎ शिक्षण घेत अाहेत.

बारावी ची बोर्ड‎ परिक्षा तोंडावर आलेली असताना‎ महाविद्यालयातील सह शिक्षक व‎ सचिवा मध्ये गेले दोन वर्षभरापासून‎ सुरू असलेला अंतर्गत वाद काही‎ केल्याने संपुष्टात येत नसल्याने या‎ अंतर्गत वादाचा फटका विद्यार्थ्यांसह‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ या ठिकाणी गेली दहा ते बारा‎ वर्षांपासून विनावेतन काम अध्यापन‎ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला‎ आहे.

त्यांच्यावर सध्या‎ उपासमारीची वेळ आली आहे.‎ मातोश्री त्रिवेणीबाई मोरे‎ महाविदयालयस सन २०२० मध्ये‎ शिक्षण विभागाकडून २०%अनुदान‎ मंजुरी मिळाले असून त्यावरून‎ संस्था सचिव व सहशिक्षक यांच्यात‎ विविध कारणांमुळे अंतर्गत वाद‎ उफळून आला आहे.‎ दोन वर्षांपासून सतत तक्रारी सुरू‎ आहेत. त्यामुळे सदरील‎ २०%अनुदान संस्थेच्या अंतर्गत‎ वादांत अडकले आहे. मात्र याचा‎ नाहक त्रास दहा बारा वर्षांपासून‎ विनावेतन काम करणाऱ्या कर्मचारी‎ तसेच विद्यार्थी यांना सहन करावा‎ लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी‎ जिल्हा परिषद यांच्याकडे‎ निवेदनाद्वारे तक्रार केली.‎

शिक्षणाचा खेळखंडोबा‎
संस्थेने शिक्षक कर्मचाऱ्यांचे‎ हजेरी रजिस्टर गायब केले असून‎ वारंवार मागणी करूनही दिले जात‎ नसल्याचा आरोप करत तुम्ही बोगस‎ शिक्षक असल्याच्या धमक्या दिल्या‎ जात अाहे. या प्रकरणी शिक्षण‎ विभागाकडे तक्रारी करून देखील‎ दखल घेतली जात नाही.मात्र‎ याप्रकरणी मुग गिळून गप्प बसलेले‎ शिक्षण विभाग काय कारवाई करणार‎ याकडे शिक्षक विद्यार्थी पालकांचं‎ लक्ष लागले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...