आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीव्र उन्हाच्या उष्णतेमुळे वायरिंगमध्ये स्पार्क होऊन आग लागल्याने कार पूर्णपणे खाक झाली. कारमधील प्रवासी द्राक्ष खरेदी करण्यासाठी खाली उतरल्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही. ही घटना सोमवारी (दि.२) आळणी (ता. उस्मानाबाद) फाट्याजवळ औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर घडली. औसा येथून औरंगाबादकडे चार प्रवासी कारने क्र. (एमएच ०१, सी ०४३५) जात होते.
आळणी फाटा येथे आल्यानंतर त्यातील दोन पुरूष व दोन महिला द्राक्ष घेण्यासाठी खाली उतरले. तेव्हा कारमधून धुर निघत असल्याचा दिसून आला. लगेच काही वेळातच कारला आग लागली. काही क्षणातच ज्वालांनी पूर्ण कारला घेरले. हा प्रकार महामार्ग पोलिसांना समजला. त्यांनी तातडीने उस्मानाबादच्या अग्निशमन दलाला बोलावले. आग विझवण्यात आली तरी त्यात कारचे पूर्ण नुकसान झाले. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये कारच्या वायरिंगमध्ये उष्णतेमुळे स्पार्किंग होऊन आग लागली असल्याचे समोर आले. प्रवाशांचे दैव बलवत्तर होते म्हणूनच ते द्राक्ष घेण्यासाठी खाली उतरले. त्याचवेळी कारने पेट घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.