आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बटाटे, वांग्यांचे भाव चढेच, कोथिंबिरीचा तडका महागला

उस्मानाबाद‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बाजार समितीत बटाटे, वांग्यांसह‎ कोथिंबीरीची आवक कमी झाल्याने‎ भाव चढे असून टोमॅटो, कोबी, हिरव्या‎ मिरचीची आवक अधिक असल्याने‎ भाव कमी आहेत. सध्या बाजारात‎ स्थानिक शेतकऱ्यांचे बटाटे दाखल‎ झाले आहेत. यामुळे किरकोळ‎ बाजारात गेल्या आठवड्यापेक्षा ५ ते १०‎ रुपयांनी बटाट्याचे दर कमी झाले.‎ धुक्यामुळे वांग्यासह काही भाज्यांचे‎ नुकसान झाले आहे. यामुळे किरकोळ‎ बाजारात काही भाज्यांच्या किमती‎ अधिक तर काही भाज्यांच्या किमती‎ कमी आहेत. यामुळे गृहिणींना‎ काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.‎

अतिवृष्टी, त्यानंतर ढगाळ‎ वातावरण, धुक्यामुळे भाजीपाल्यांचा‎ दर्जा घसरला आहे. टोमॅटोवर डाग‎ पडले असून वांग्यावर अळीचा प्रादुर्भाव‎ झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी फवारणी‎ करून जोपासलेल्या वांग्यांना सध्या‎ चांगला दर मिळत आहे. बटाट्याची‎ आवक कमी असल्याने व स्थानिकचा‎ बटाटा कमी झाल्याने दोन वर्षापासून‎ बटाट्याचे दर ३० रुपयांपेक्षा कमी झाले‎ नाहीत. दोन आठवड्यापूर्वी किरकोळ‎ बाजारात ३५ ते ४० रुपये किलोवर बटाटे‎ गेले होते. कोथिंबिरीची आवकही कमी‎ आहे. जून २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंत‎ सर्वाधिक काळ ढगाळ वातावरण‎ राहिले होते. यामुळे पालेभाज्यांसह‎ फळभाज्यांचे उत्पन्न कमी होत आहे.‎ फेब्रुवारीतही थोडे धुके असल्याने रब्बी‎ हंगामातील पिकांसह पालेभाज्या आणि‎ फळभाज्यांचा दर्जा घसरला आहे.

‎यामुळे बाजारापेठेत भाव कमी मिळत‎ आहे. जिल्ह्यात भेंडी, कोबी, वांगी,‎ टोमॅटो, कोथिंबीर, दोडका, घेवडा इतर‎ भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात‎ होते. सध्या शेतकऱ्यांच्या काही‎ मालाला योग्य भाव मिळत आहे तर‎ काही मालाची आवक अधिक‎ असल्याने अत्यंत कमी दर मिळत‎ आहेत. टोमॅटो उत्पादकांना मशागतीसह‎ माल बाजार समितीत ने आण‎ करण्याचा खर्चही निघत नाही. यामुळे‎ शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात‎ आहे. धुक्यामुळे टोमॅटोवर काळे डाग‎ निर्माण होत आहेत. दर्जा घसरल्याने‎ टोमॅटोला अपेक्षित भाव मिळत नाही.‎ सध्या किरकोळ बाजारात टोमॅटो ७ ते‎ १० रुपये किलोने विक्री होत आहेत.‎

धुक्यामुळे फवारणीचा खर्च वाढला
यंदा पावसाळा व हिवाळ्यात सर्वाधिक काळ ढगाळ‎ वातावरण व धुक्यामुळे भाज्यांवर रोगाचा प्रादुर्भाव‎ जाणवत होता. शेतकऱ्यांना कीटकनाशकाची‎ फवारणी करावी लागत. यामध्ये शेतकऱ्यांचा पैसाही‎ खर्च होऊनही अपेक्षित माल मिळत नाही. यामुळे‎ बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही.‎

उत्पादन खर्च कमी करण्याची गरज‎
यंदा सतत ढगाळ वातावरण व धुके असल्याने‎ वांग्यासह टोमॅटोवर अळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे‎ सध्या भाव मिळत असतानाही वांग्याचे अपेक्षित‎ उत्पन्न मिळत नाही. शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा‎ अभ्यास करून भाजीपाल्याची लागवड केल्यास‎ योग्य भाव मिळेल. हंगामी भाजीपाल्याऐवजी‎ बारमाही भाजीपाल्याला चांगला भाव मिळतो.‎ -छत्रगुण शिंदे, शेतकरी.‎

बातम्या आणखी आहेत...