आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रक्रिया थंडावली‎:कळंब मार्केट यार्डातील अतिक्रमण‎ काढण्याची प्रक्रिया थंडावली‎

कळंब‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी उत्पन्न बाजार समिती‎ प्रशासनाने परिसरातील जागा‎ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी‎ पाऊल उचलले होते. मात्र सध्या‎ अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया‎ थंडावली असून आता अतिक्रमण‎ निघणार की नाही असा प्रश्न‎ उपस्थित होत आहे.‎ उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात‎ मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती ही‎ कळंबची आहे. दररोज येथे मोठया‎ प्रमाणावर शेतमालाची आवक होते.‎ कृषि उत्पन्न बाजार समिती‎ कळंबला शेतकऱ्यांच्या‎ शेतमालाच्या खरेदी विक्री चा‎ व्यवसाय करण्याकरता शासनाने‎ अधिग्रहण करून जवळपास २७‎ एकर १२ गुंठे जमीन बाजार‎ समितीस दिली होती.

दिलेल्या‎ जमिनीवर ३०/१०/१९५३ पासून‎ बाजार समितीचे कामकाज सुरू‎ आहे.‎ सदर बाजार समितीच्या अधिग्रहण‎ केलेल्या जमिनीवर शेतीपूरक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ व्यवसाय करण्याकरीता दिलेल्या‎ भूखंडांपैकी काही भूखंडावर‎ विशिष्ट उद्योगासाठी राखून‎ ठेवलेल्या जागेवर काही लोकांनी‎ अतिक्रमण केले आहे.‎ हे अतिक्रमण काढण्यासाठी सचिव‎ दत्तात्रय वाघ यांनी प्रयत्न चालू‎ केला होता. अतिक्रमण काढण्याच्या‎ प्रक्रियेला गतीसुध्दा आली होती.‎ त्यामुळे आता बाजार समिती मधील‎ दोन एकरच्या आसपास जमीन‎ अतिक्रमणमुक्त होइल असे वाटत‎ होते. मात्र अचानक अतिक्रमण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ काढण्याची प्रक्रिया थंडावली आहे.‎ कृषी उत्पन्न बाजार समिती‎ प्रशासन व अतिक्रमण धारक यांच्या‎ जोरदार वाद सुरू झाला आहे.‎ समितीच्या साधारण दोन एकर‎ म्हणजे २० कोटी रुपये किंमत‎ असणाऱ्या जमिनीवर अतिक्रमण‎ झाले आहे. भविष्यात अतिक्रमण‎ निघाले तर यातून बाजार समितीचे‎ आणखीन उत्पन्न वाढण्यास मदत‎ मिळणार आहे. कळंब आणि‎ परिसरातून मोठया प्रमाणावर‎ शेतकरी येत असतात.‎

धमक्या व गुन्हे दाखल करण्याचे प्रकार‎
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण विरोधी‎ कारवाई संदर्भात दाखल केलेला मनाईचा अर्ज उस्मानाबाद न्यायालयाने‎ फेटाळला होता. आठ दिवसाच्या आता अतिक्रमण काढण्याची मुदत‎ देण्यात आली होती. हा आठवड्याचा कालावधी संपलेला असून अद्यापही‎ अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली नाही. कृषि उत्पन्न बाजार समिती‎ आवारातील अतिक्रमण प्रकरण चांगलेच चिघळले होते. दोन वेळा बाजार‎ समिती चे सचिव दत्तात्रय वाघ यांना धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.‎ या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.‎ त्यामुळे अतिक्रमण धारक किती आक्रमक झालेले आहेत. यावरून दिसून‎ येत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...