आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:धाराशिव-उजनी रस्त्याचे काम 5 वर्षांपासून अपूर्ण‎

धाराशिव‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या‎ धाराशिव ते उजनी या ३५ किलोमीटर‎ रस्त्याचे काम पूर्ण करण्यात दिरंगाई होत‎ असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.‎ बेंबळीपर्यंत डांबरीकरण केल्यानंतर उजनी‎ रस्त्यावरील खडी टाकण्याचे काम पूर्ण केले‎ जात आहे. तसेच रुईभरजवळ खोदकाम‎ करून दीड महिना झाला तरी येथे‎ डांबरीकरणाचा अद्याप पत्ता नाही.‎ हायब्रिड अन्युटींतर्गत १०४ कोटींच्या‎ निधीतून धाराशिव ते उजनी रस्त्याचे काम‎ हाती घेण्यात आले. ३५ किमी रस्त्याचे‎ दुपदरीकरण कामाला सुरुवात होऊन पाच‎ वर्षांहून अधिक कालावधी होऊनही काम‎ पूर्ण झाले नाही.

अगोदरचे तीन वर्ष तर हा‎ रस्ता जागोजागी खोदून ठेवला होता. नंतर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याने कसेबसे‎ बेंबळीपर्यंतचे डांबरीकरण केले. डांबरीकरण‎ करून सहा महिने झाले आहेत. मात्र,‎ बेंबळीपासून उजनीपर्यंतच्या रस्त्याचे‎ अद्यापही खोदकाम व खडीकाम सुरू आहे.‎ हे काम मंद गतीने सुरू असून प्रशासकीय‎ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. बेंबळीपर्यंत चांगला‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रवास झाला तर पुढे उजनीपर्यंत जीव मुठीत‎ घेऊन प्रवास करावा लागत आहे. उजनी‎ रस्त्यावर अनेक ठिकाणी खडीचे ढिग‎ टाकले आहेत. अनेक ठिकाणी खडी‎ विखरून पडली आहे. यामुळे दुचाकीच नव्हे‎ तर चारचाकी वाहनेही घसरून पडत आहेत.‎ अनेक प्रवासी सातत्याने जखमी होत आहेत.‎

बेंबळीचा प्रवास पुन्हा खडतर‎
रुईभर परिसरात सुमारे तीन किलोमीटरपर्यंत रस्ता‎ खोदण्यात आला आहे. रस्ता खोदून दीड महिना‎ होत अाला तरी डांबरीकरणासाठी मुहूर्त‎ मिळालेला नाही. येथे खोदकामाच्या अगोदरच‎ चांगला रस्ता होता. हाच रस्ता खोदला आहे.‎ यामुळे बेंबळीपर्यंत तरी सुखकर होत असलेल्या‎ प्रवास पुन्हा खडतर झाला आहे. येथेही खडीचे‎ मोठे ढिग टाकण्यात आले आहेत.‎

एप्रिलपर्यंत काम पूर्ण करणार‎
होळीमुळे इतके दिवस काम बंद होते. आता‎ काम वेगाने करून एप्रिलपर्यंत सर्व काम पूर्ण‎ करण्याचे नियोजन आहे. लवकरच डांबरीकरणही‎ करण्यात येणार आहे.‎ -आदित्य बुरूड, कंत्राटदार प्रतिनिधी.‎

बातम्या आणखी आहेत...