आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎दिव्य मराठी विशेष:दोन हजार शेतकऱ्यांना 50 हजाराचे अनुदान नाही‎

धाराशिव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नियमित पीककर्जाची परतफेड करणाऱ्या‎ शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान‎ वितरीत करण्यात येत आहे. परंतु, आधार‎ प्रमाणीकरण करूनही दोन हजार १५२ शेतकऱ्यांना‎ गेल्या अनेक दिवसांपासून अनुदान वितरण‎ करण्यात आले नाही. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती‎ बँकेतील माहिती चुकलेल्या शेतकऱ्यांचाही‎ समावेश आहे. असे शेतकरी सातत्याने बँकेत व‎ जिल्हा उपनिबंधक कार्यालयात फेऱ्या मारून‎ थकून गेले आहेत.‎ महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती‎ योजनेतील प्रोत्साहनपर लाभ योजनेचे जिल्ह्यात‎ अद्यापही भिजत घोंगडे आहे. यामुळे शेतकरी‎ आता वैतागून जात आहेत. एकतर देवेंद्र‎ फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी नियमित‎ कर्जफेड करणाऱ्यांना कर्जमाफी योजनेतून‎ वगळले होते.

शेतकरी उसनवारी करून किंवा‎ सावकारांकडे दागिना गहाण ठेवून पीककर्जाची‎ परतफेड करून नूतनीकरण करत असतो. त्यात‎ फडणवीस सरकारने त्यांना चांगला लाभ दिला‎ नाही. यामुळे नियमित नूतनीकरण करून आम्ही‎ पाप केले का, असा प्रश्न शेतकरी विचारत होते.‎ नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अशा‎ शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम‎ देण्याचे जाहीर केले होते. नंतर एकनाथ शिंदे‎ मुख्यमंत्री झाल्यावर कशीबशी रक्कम मिळू‎ लागली. जिल्ह्यातील २१५२ शेतकऱ्यांना आधार‎ प्रमाणीकरण करूनही रक्कम खात्यावर पडत‎ नाही. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आधार‎ प्रमाणीकरण करून पाच महिने झाले. त्यांची‎ माहितीच बँकेकडून चुकीची भरली होती. यामुळे‎ त्यांचे अनुदान रखडले. यात जिल्हा बँकेचे‎ खातेदार अधिक असून प्रोत्साहनपर रक्कम‎ मिळणे अशक्य झाले .

आतापर्यंत ३९०८८ शेतकऱ्यांना ११५.७२ कोटींचे वितरण‎
आतापर्यंत जिल्ह्यातील ३९ हजार ८८‎ शेतकऱ्यांना टप्प्याने ११५ कोटी ७२ लाख‎ रुपयांचे वितरण करण्यात आले. ही रक्कम‎ सहा टप्प्यात देण्यात आली. पूर्वी १०१ कोटी‎ वितरीत झाल्यानंतर नंतर रक्कम देण्यात‎ आली नव्हती. यामुळे अनेक शेतकरी‎ हवालदिल झाले होते. गत महिन्यात ३३६५‎ शेतकऱ्यांची नवीन यादी प्रकाशित करण्यात‎ आली होती. त्यातील व पूर्वीच्या उरलेल्या‎ पाच हजार शेतकऱ्यांना १४ कोटी रुपये‎ वितरीत झाले आहेत. मात्र, अद्यापही दोन‎ हजार शेतकरी अजूनही वंचित आहेत.

फेऱ्या मारून थकलो‎
जिल्हा बँक व डीडीआर ऑफिसमध्ये‎ फेऱ्या मारून थकलो तरी अनुदान मिळत‎ नाही. नेमके अनुदान कोठे गेले ?‎ शेतकऱ्यांना हे का दिले जात नाही ? याबाबत‎ आता संशय वाढत आहे. तातडीने रक्कम न‎ मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.‎ -भारत पाटील, शेतकरी संघटना.‎

मार्चमध्ये मिळेल रक्कम‎
ज्यांची माहिती चुकली होती, अशा‎ शेतकऱ्यांची माहिती पुन्हा एकदा ऑनलाइन‎ प्रणालीतून शासनाकडे पाठवण्यात आली‎ आहे. यासाठी झालेल्या बैठकीत मार्चमध्ये‎ रक्कम देण्यात येणार आहे, असे सांगण्यात‎ आले आहे.‎- सुनिल शिरापूरकर, जिल्हा उपनिबंधक.‎

बातम्या आणखी आहेत...