आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूर मराठा आरक्षणाचा एल्गार पुन्हा घुमणार असून तुळजापूर ते मुंबई वनवास यात्रा काढण्यात येत आहे. तुळजाभवानी मातेच्या दरबारातून वनवास यात्रेला प्रारंभ होणार आहे. मराठ्यांना ओबीसींमधून कायद्याच्या कसोटीवर टिकणारे ५० टक्क्यांच्या आतील आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी (दि.६) तीर्थक्षेत्र तुळजापूर येथून पायी मराठा वनवास यात्रा निघणार आहे.
आरक्षण घेतल्याशिवाय तुळजापूर सोडणार नसल्याचे यात्रा प्रमुख योगेश केदार यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सुनिल नागणे, प्रताप कांचन पाटील आदींची उपस्थिती होती.
जमावबंदी लागू
योगेश केदार म्हणाले की, ओबीसींची महाराष्ट्रात केवळ ३४ टक्के संख्या आहे. त्या अनुषंगाने ओबीसींना १७ टक्के आरक्षण देय आहे. त्यादृष्टीने मराठ्यांचा ओबीसीत समावेश गरजेचा आहे. मराठा वनवास यात्रेत ओबीसी समाजाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे.
यावेळी महेश केदार, शाम माळी, तात्या महाराज लोमटे, विशाल केदार, प्रशांत कांचन पाटील, कन्हैया लंबे, विशाल सावंत, विशाल केदार, औदुंबर खलाटे उपस्थित होते. दरम्यान, मराठा वनवास यात्रेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध पाहता पोलिसांनी खबरदारी म्हणून कलम १४४ लावत जमावबंदी लागू केली आहे.
पहाटे, संध्याकाळी चालणार
उन्हाळ्याचा विचार करता, ही वनवास यात्रा पहाटे ५ ते सकाळी १० पर्यंत आणि संध्याकाळी ५ ते रात्री ८ दरम्यान चालणार आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत आराम केला जाईल. या शिवाय खबरदारी म्हणून रुग्णवाहिका, आरोग्य सुविधा सोबत असणार असल्याचे केदार यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.