आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य निवडणूक विभाग उस्मानाबाद तहसील कार्यालयासह श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील मतदार साक्षरता कक्ष, राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मतदार नाव नोंदणी विशेष अभियानाची बुधवारी (दि.७) तहसीलदार प्रसाद चौगुले यांच्या उपस्थितीत सुरुवात केली आहे.
प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव अध्यक्षस्थानी होते. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून लोकशाहीच्या यशासाठी मतदारांची भुमिका महत्वाची असते. त्यासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावी, असे आवाहन तहसीलदार प्रसाद चौगुले यांनी केले. प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांनी प्रातिनिधिक लोकशाहीत प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार हा मतदारांना असल्याने १८ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावित. देशात युवकांची संख्या सर्वाधिक असून लोकशाही बळकट करण्यात सहभाग नोंदवावेत, असे मत व्यक्त केले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुनील बिराजदार, उपप्राचार्य प्रा. जी. एस. मोरे, पर्यवेक्षक प्रा. शैलेश महामुनी, नायब तहसीलदार एन. आर. मनुरवाड, निवडणूक विभाग संदीप सरपे, प्रा. एस. ए. कुंभार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. जी. एन. सोमवंशी, डॉ. विनोद देवकर, सूरज सूर्यवंशी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. डॉ. डी. बी. ढोबळे यांनी सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.