आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंमलबजावणी:वॉटर ग्रीड, कृष्णा खोरे, मराठवाडा‎ सिंचन योजनेने पाणी प्रश्न मिटणार‎

धाराशिव‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा वॉटर ग्रीड, कृष्णा खोरे सिंचन‎ योजनेमुळे जिल्ह्यातील पिण्याच्या‎ पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.‎ महाविकास आघाडीच्या काळात या‎ प्रकल्पांना ब्रेक लागला होता. मात्र, आता‎ अर्थसंकल्पात याची भरीव तरतूद केल्याने‎ या योजनांना गती येणार आहे, अशी‎ माहिती भाजप आमदार राणाजगजितसिंह‎ पाटील यांनी दिली.‎ ‘जिल्ह्याला अर्थसंकल्पातून काय‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मिळाले’, याची माहिती देण्यासाठी‎ आमदार राणा पाटील यांनी पत्रकार परिषद‎ घेतली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन‎ काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ‎ कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नेताजी पाटील, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष‎ राजसिंहा राजेनिंबाळकर उपस्थित होते.‎ राणा पाटील म्हणाले की, १९९९ ला डॉ.‎ पद्मसिंह पाटील यांनी मराठवाडा सिंचन‎ प्रकल्पाला मंजूरी मिळवून घेतली होती.

मध्यंतरी यासाठी तरतूद‎ करण्यात आली. नंतर महाविकास आघाडीच्या‎ काळात नव्याने प्रशासकीय मान्यता न दिल्याने प्रकल्प‎ रखडला. मात्र, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎ यांनी ११ हजार ६२६ कोटींची मान्यता दिली आहे.‎ यामुळे २०२४ मध्ये सिंचनासाठी जिल्ह्याला पाणी‎ उपलब्ध होणार आहे. तसेच मराठवाडा वॉटर ग्रीड‎ योजनेचीही अशीच परिस्थिती होती. याचाही मार्ग‎ माेकळा होणार असून सीना कोळेगाव, निम्न तेरणा व‎ उजनी प्रकल्प एकमेकांना जोडून पिण्यासाठी पाणी‎ उपलब्ध केले जाणार आहे. राज्याच्या बजेटमुळे‎ राज्यासह जिल्ह्यालाही नवी दिशा मिळणार आहे.‎ पुढील वर्षी फेब्रुवारीत याचा अॅक्शन टेकिंग रिपोर्ट‎ सादर केला जाणार आहे. यामुळे सर्व योजना केवळ‎ घोषणांपुरत्या मर्यादित न राहता, अंमलबजावणी‎ होणार आहे.‎

आमदार पाटील म्हणाले
‎‎मेडिकल कॉलेजसाठी आयटीआयची‎ जमीन हस्तांतरणासाठी मुख्यमंत्री,‎ उपमुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली बैठक.‎ धाराशिव नामांतरासाठी सर्व बाबींची‎ पूर्तता शिंदे-फडवणीस सरकारने केली,‎ महाविकास आघाडीने श्रेय घेणे निरर्थक.‎सोलापूर- तुळजापूर- धाराशिव रेल्वे‎ मार्गासाठी ५० टक्के वाटा मंजूर केल्याने‎ आता या कामाला गती येणार आहे.‎ नागपूर ते गोवा महामार्ग तुळजापुरातून‎ जात असल्याने जिल्ह्याला याचा फायदा‎ होणार आहे. शहरांची बाजारपेठ जवळ.‎ मराठवाडा व कोकणात दुग्धविकास‎ होण्यासाठी १६० कोटींची तरतूद केल्याने‎ धाराशिव जिल्ह्यातील दुग्धोव्यवसायाला‎ चालना मिळणार.‎

बातम्या आणखी आहेत...