आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरासह ग्रामीण भागातील शेतांमधील उभ्या पिकात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. यामुळे ऊस, ज्वारी व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वनविभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. तालुक्यात रानडुकरांमुळे रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊ लागल्याने शेत त्रस्त आहेत.
ज्वारी, ऊस, मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग आहे. रानडुकरं दिवसभर तेथे लपून रात्रीचे पिकांवर हल्ला चढवत आहेत. ही रानडुकरं दिवसा उसाच्या फडात असतात. रात्र झाल्यानंतर पिके फस्त करतात. रानडुकरे मुळासहित ऊस खात असल्याने मोठे नुकसान होत आहे.
डुकरांचा धुमाकूळ असाच सुरू राहिल्यास पिकांपासून उत्पन्न मिळणे दुरापास्त आहे, अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत. तालुक्यातील भूम, हाडोंग्री, हिवरा, वंजारवाडी, आरसोली, सावरगाव या परिसरात रानडुकरांच्या टोळ्या आहेत.
प्रतिबंध केल्यास रानडुक्कर अंगावर धावून चावा घेतात, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी नवनवीन क्लुप्त्या काढत आहेत. औषधांचा वापर करत आहेत. परंतु वन्यप्राणी पिकांची नासाडी करतच असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात यांनी केली आहे. शेतकऱ्यांना यातून दिलाशाची आशा लागली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.