आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुर्डुवाडी जंक्शनवरून दिल्लीला शेतमाल पाठवण्याची सेवा सुरू झाली आहे. हुबळी निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून शेतकऱ्यांना आपला कृषीमाल पाठवता येईल. दर शनिवारी ही रेल्वे धावणार आहे. हुबळी निजामुद्दीन एक्स्प्रेसला पार्सल सेवा सुरू केली आहे. रेल्वेने किसान रेल्वे सेवा सुरू केल्यापासून जिल्ह्यातील सांगोला, माढा, माळशिरस, करमाळा तालुक्यातील डाळिंब, केळी, पेरू, सीताफळ व भाजीपाला यासारखी फळ पिके दिल्ली बाजारपेठेत सवलतीच्या दरात पाठवली जात होती. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत हाेता. मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून ही सेवा बंद होती. शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष किरण डोके, विजय लबडे, नानासाहेब साळुंके व इतरांनी याबाबत पाठपुरावा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.