आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:सास्तूरच्या स्पर्श ग्रामीण रूग्णालयात‎ महिला दिनी व्याख्यानाचे आयोजन‎

लोहारा‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री आहे म्हणून घराला घरपण‎ आहे. ती आहे म्हणूनच नात्यांमध्ये‎ जिवंतपणा आहे. तिचा सन्मान‎ करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.‎ तसेच महिलांमुळेच कुटुंब‎ व्यवस्थेचा कणा मजबूत आहे असे‎ प्रतिपादन स्त्रीरोग तज्ञ डॉ. मीरा‎ देशपांडे यांनी केले आहे.‎ तालुक्यातील सास्तूर येथील‎ स्पर्श ग्रामीण रुग्णालयात बुधवारी‎ (दि.८) जागतिक महिला‎ दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात‎ त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास‎ स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी‎ रमाकांत जोशी, स्त्रीरोगतज्ञ डॉ.‎ मीरा देशपांडे, डॉ. मैत्री तावशीकार,‎ डॉ. अशोक मस्के, पडवळ मॅडम,‎ श्री. पवार, ग्रामीण रुग्णालय‎ स्पर्शच्या नर्स इन्चार्ज शिल्पा शिंदे,‎ रुग्णालयातील सर्व महिला‎‎‎‎‎‎‎‎‎ कर्मचारी, अधिपरिचारिका तसेच‎ परिसरातील महिला उपस्थित होत्या.‎

प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी‎ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.‎ ते म्हणाले की, खरे तर महिला या‎ पुरुषापेक्षा जास्त कष्टाळू, कनवाळू‎ असतात. तरी त्यांना अबला‎ संबोधले जाते हे पटत नाही.‎ महिलाचा कायमस्वरूपी दररोज‎ सन्मानच झाला पाहिजे. प्रत्येक‎ महान व्यक्तीच्या जीवनात आणि‎ यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा‎ आहे. संपूर्ण विश्वात भारतीय‎ संस्कृती आदर्श ठरली आहे. ती या‎‎‎‎‎‎‎‎‎ संस्कृतीतील स्त्रियांच्या अनन्य‎ साधारण योगदानामुळे आणि‎ म्हणूनच आजच्या जागतिक महिला‎ दिनी मनुष्य जीवनात आनंद निर्माण‎ करणाऱ्या समस्त महिला विषयी‎ कृतज्ञता व्यक्त करू या असे‎ आवाहन त्यांनी यावेळी केले.‎ स्त्रीरोग तज्ञ डॉ. मैत्री तावशीकर‎ म्हणाल्या की, निश्चितच स्त्रियांचा‎ सन्मान झाला पाहिजे. तसेच‎ स्त्रियांनी एकमेकीच्या नात्याचा‎ आदर केला पाहिजे. एकमेकाबद्दल‎ विश्वास वाढवला पाहिजे. तरच‎ महिलांत एकी राहिल.‎

बातम्या आणखी आहेत...