आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्यात होळी व धूलिवंदनाच्या दिवशी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही यासाठी स्थानिक पोलिसांनी सतर्क राहावे, दारू पिऊन वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच रंगाचा बेरंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील ठाणेदारांना शनिवारी (४ मार्च) दिले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात होळी व धूलिवंदनाच्या दिवशी कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दल सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ठाणेदारांशी संवाद साधला आहे. जिल्ह्यात या कालावधीत संवेदनशील भागात वाढीव पोलिस बंदोबस्त ठेवावा. त्यासाठी राज्य राखीव दलाची कंपनी तैनात केली जाणार आहे. ठाणेदारांनी मागणी केल्यास त्यांच्याकडे बंदोबस्त पाठवला जाईल. याशिवाय आवश्यक त्या भागात छायाचित्रीकरण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.शहरासह जिल्ह्यात मोठ्या शहरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर लक्ष ठेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.