आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचे पाऊल:तीन हजार शाळांमध्ये तपासणार‎ विद्यार्थ्यांच्या क्षमता अन् सुविधा‎,  17 मार्च रोजी राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण‎

हिंगाेली‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यातील शाळांमध्ये होणार‎ सर्वेक्षण‎ छत्रपती संभाजीनगर ४९६‎ बीड ४३७‎ हिंगोली २१९‎ जालना ३५६‎ लातूर ३७८‎ नांदेड ५१३‎ उस्मानाबाद २६६‎ परभणी ३२३‎

मराठवाड्यात ३००० शाळांमधून १७ मार्च ‎ ‎ रोजी एकाच वेळी इयत्ता तिसरी, पाचवी‎ व आठवी वर्गाचे राज्यस्तरीय संपादणूक ‎ ‎ सर्वेक्षण केले जाणार आहे. राज्य‎ शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे ‎ ‎ यांच्या वतीने हे सर्वेक्षण केले जात आहे. ‎ ‎ जिल्हास्तरावर याची जबाबदारी डाएटवर ‎ ‎ सोपवण्यात आली आहे. या वेळी‎ ओएमआर पद्धतीने परीक्षा घेतल्या‎ जाणार आहेत. राज्यस्तरावरून प्रथमच हे ‎ ‎ सर्वेक्षण केले जात आहे. या माध्यमातून ‎ ‎ प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत‎ क्षमता आणि शाळांमधून दिल्या जाणाऱ्या‎ सुविधांची माहिती घेतली जाणार आहे.‎ राज्यात विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर‎ निश्‍चितीसाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय‎ संपादणूक चाचणी घेतली जाते. यापूर्वी‎ सन २०१७ व त्यानंतर सन २०२१ मध्ये या‎ चाचण्या झाल्या होत्या. आता राज्य‎ शासनाने राज्य शैक्षणिक संशोधन‎ प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यस्तरीय‎ संपादणूक सर्वेक्षण करण्याचा निर्णय‎ घेतला आहे. त्यानुसार रँडम पद्धतीने‎ मराठवाड्यातील ३००० शाळांची निवड‎ केली आहे. १७ मार्च रोजी एकाच वेळी‎ शाळांमधून विद्यार्थ्यांची बहुपर्यायी परीक्षा‎ घेतली जाणार आहे.

मराठी व गणित‎ विषयाची ही परीक्षा असणार आहे. यात‎ इयत्ता तिसरी व पाचवी वर्गासाठी मराठी‎ भाषेचे २०, तर गणिताचे २५ असे ४५‎ प्रश्‍न असणार असून त्यासाठी दीड‎ तासाचा वेळ असणार आहे. आठवीच्या‎ विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचे २५, तर‎ गणिताचे ३५ असे ६० प्रश्‍न दिले जाणार‎ आहेत. त्यासाठी १ तास २० मिनिटांचा‎ कालावधी दिला जाणार आहे.‎ विद्यार्थ्यांना ओएमआर उत्तरपत्रिकेवर‎ उत्तरे नमूद करावी लागणार आहेत.‎ त्यानंतर प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिका पुणे‎ कार्यालयाकडे पाठवल्या जाणार आहेत.‎ सुमारे १ महिन्यानंतर या परीक्षांचा निकाल‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ जाहीर केला जाणार आहे. या शाळांचा‎ निकाल म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा निकाल‎ असणार आहे. या परीक्षेतील गुणानुसार‎ त्या त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची‎ अध्ययन क्षमता किती आहे, अध्ययन‎ स्थिती काय आहे हे ठरवले जाणार आहे.‎ या सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरावर‎ डाएटकडे जबाबदारी सोपवण्यात आली‎ आहे. ज्या ज्या ठिकाणी परीक्षा होणार‎ आहे. तेथे प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिकांचा‎ पुणे येथूनच पुरवठा केला जाणार‎ असल्याचे सूत्रांनी सांगितले.‎ विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि शाळेतील‎ सुविधा तपासण्यासाठी हे सर्वेक्षण‎ महत्त्वाचे ठरणार आहे.‎ सर्वेक्षणासाठी यंत्रणांना प्रशिक्षण‎ या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या शिक्षकांना प्रशिक्षण‎ देण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्यक्ष शाळास्तरावर सर्वेक्षण‎ केले जाईल. त्या वेळी शाळेत एका बेंचवर एकच विद्यार्थी‎ बसवला जाणार आहे. सदर सर्वेक्षण म्हणजे परीक्षा नाही.‎ त्यामुळे त्याचे गुण कुठेही उघड केले जाणार नाहीत.‎ - अंकुश ससाणे, राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण, हिंगोली‎ विभागप्रमुख.‎

बातम्या आणखी आहेत...