आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, पुणे यांनी पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व पाठ्यपुस्तकात सर्वत्र ‘ल’ व ‘श’ व तोडाक्षर पद्धतीच कायम ठेवली आहे. द्वी ऐवजी दुवि, उद्देश ऐवजी उद्देश्य असे अनेक शब्द पाठ्यपुस्तकात आढळतात. यामुळे शासनाच्या आदेशाला एक प्रकारे केराची टाेपली दाखवणे सुरू असल्याचा आराेप शिक्षण तज्ञ प्र.ह.दलाल यांनी केला आहे.
मराठीतील लेखनदोष दूर करण्यासाठी नियुक्त समितीच्या शिफारशी स्वीकारून राज्य शासनाने ६ नोव्हेंबर २००९ रोजी पारंपारिक जोडाक्षर पद्धती व ‘श’, ‘ल’ ही पारंपारिक वळणे पुन्हा सुरु करण्यासाठी आदेश काढला होता. हा निर्णय सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळांना बंधनकारक होता. पण, तो पाळला जात नाही. याबाबत दलाल यांनी दिलेल्या निवेदनात, पाठ्यपुस्तक मंडळाला या नियमांवर आक्षेप असला तरी त्यावर शासन निर्णय देत नाही तोपर्यंत विद्यमान आदेशच पाळावा असे आवाहन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.