आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व धनाजी नाना महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, युवतींसाठी ८ ते १३ मार्च या काळात मिशन साहसी अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्राचार्य डॉ.लता मोरे, शिक्षण शास्त्र महाविद्यालय खिरोदा यांच्याहस्ते झाले. त्यांनी महिला व स्वयंरोजगार या विषयावर विचार मांडले. तिसऱ्या दिवशी डॉ.सतीश चौधरी यांनी महिला व समान संधी या विषयावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन माधुरी भरणे हिने यांनी आभार दिव्या वानखेडे यांनी मानले. दुसऱ्या दिवशी प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी स्त्रियांमधील धैर्य व स्वतःच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिराची गरज आहे, असे सांगितले.
डॉ.प्रियदर्शनी सरोदे यांनी ''महिलांचा आहार व आरोग्य व त्यावर उपाययोजना हा विषय मांडताना युवतींनी स्वतःची शारीरिक व मानसिक काळजी कशी घ्यावी, त्याचबरोबर बदलत्या वयाप्रमाणे त्यांना आवश्यक त्या आहाराचा उपयोग कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य प्रा.डी.बी.तायडे यांनी युवतींनी सावित्रीबाईचा वारसा पुढे चालवायचा आहे. त्यांची प्रेरणा घेऊन आयुष्यात शिक्षणात कसे अग्रेसर व्हावे हे सांगितले. तसेच युवतींनी श्रद्धा जरूर जोपासावी पण अंधश्रद्धा बाजूला ठेवावी असे आवाहन केले. सूत्रसंचालनमहेक तडवी यांनी केले, आभार रोहिणी माळी या विद्यार्थिनीने मानले. प्रास्ताविक डॉ.कल्पना पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.जी.जी कोल्हे, डॉ.राजश्री नेमाडे, डॉ.सविता वाघमारे, डॉ.जयश्री पाटील, डॉ.सीमा बरी, डॉ.पल्लवी भंगाळे, प्रा.नाहीदा कुरेशी, प्रा.शुभांगी पाटील यांनी सहकार्य केले. साहसी अभियान कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी विविध विषयांवर मार्गदर्शन मिळाले. तसेच त्यांच्या शंकांचे निसरन झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.