आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎बंधारा भरला:हतनूरमधील आवर्तनाने 40‎ दिवस टंचाईतून झाली सुटका‎

भुसावळ‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्च महिन्याच्या सुरूवातीला शहराला‎ पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या तापी‎ नदीतील बंधाऱ्याने तळ गाठला होता.‎ त्यात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल‎ एवढाच साठा असल्याने शहर टंचाईच्या‎ उंबरठ्यावर होते. ही स्थिती पाहून‎ पालिकेने पाटबंधारे विभागाकडे हतनूर‎ धरणातून आवर्तनाची मागणी केली होती.‎ त्यास प्रतिसाद मिळून सुटलेले आवर्तन‎ बुधवारी सकाळी पोहोचून बंधारा तुडुंब‎ भरला. परिणामी भुसावळकरांची आगामी‎ ४० दिवसांची तहान भागेल.‎ शहराला तापी पात्रातील बंधाऱ्यातून‎ पाणीपुरवठा केला जातो. या बंधाऱ्यात‎ सुमारे ४० दिवसांचा जलसाठा करता येतो.‎ मात्र, गेल्या पंधरवड्यापासून बंधाऱ्याची‎ जल पातळी घसरली. ही स्थिती पाहून‎ पालिकेने हतनूर धरण प्रशासनाकडे‎ आवर्तनाची मागणी केली होती. यानुसार‎ हतनूर धरणातून ८.९५ दलघमी (१ हजार‎ क्युसेक दररोज) आवर्तन सोडण्यात‎ आले होते.‎

उन्हाळी हंगामात चार आवर्तन‎
यंदाच्या उन्हाळी हंगामात हतनूर धरणातून‎ तापी पात्रात ४ आवर्तने सोडण्यात येतील.‎ आता मिळालेले दुसरे आवर्तन आहे.‎ त्यामुळे पावसाळ्या पर्यंत शहरात टंचाई‎ निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे.‎ तरीही नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा‎ काटकसरीने वापर करावा.‎

पाइपलाइन दुरुस्ती गरजेची
‎बंधाऱ्यातील जलसाठा वाढल्याने अशुद्ध‎ पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. मात्र,‎ शहरातील जलवाहिन्यांना ठिकठिकाणी‎ लागलेली गळती अजूनही कायम आहे.‎ यामुळे उन्हाळ्यात शुद्ध पाण्याचा अपव्यय‎ होण्यासोबतच जलजन्य आजारांचा धोका‎ वाढू शकतो, अशी स्थिती आहे.‎

रेल्वे, दीपनगरला दिलासा‎
भुसावळ शहरासोबत भुसावळ विभागीय‎ रेल्वे आणि दीपनगर औष्णिक वीजनिर्मीती‎ केंद्राने देखील हतनूरमधून आवर्तनाची‎ मागणी केली होती.त्यामुळे आता सुटलेल्या‎ आवर्तनामुळे पालिकेसोबतच रेल्वे व‎ दीपनगरच्या बंधाऱ्यातही मुबलक साठा‎ राहणार आहे.या दोन्ही विभागांना टंचाईच्या‎ झळा जाणवणार नाहीत.‎

पाणी चाेरी‎ केल्यास‎ कारवाई‎
हतनूर धरणातून साेडलेले आवर्तन हे केवळ पिण्याच्या‎ पाण्यासाठी आहे. त्यामुळे कोणीही शेती अथवा उद्योगासाठी‎ माेटरीने नदीपात्रातून पाण्याची चाेरी केल्यास कारवाई होईल.‎ -एस.जी.चौधरी, शाखा अभियंता,हतनूर धरण‎

बातम्या आणखी आहेत...