आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तडाखा:हॉटसिटीत पेटला वैशाख वणवा, बुधवारी‎ होते यंदाचे सर्वाधिक 44.8 अंश तापमान‎;  रस्ते, चौक निर्मनुष्य; बाजारपेठेतही निरूत्साह‎

भुसावळ‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या तापमानात दररोज वाढ‎ होत आहे. बुधवारी यंदाच्या‎ उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.८‎ तापमानाची नोंद शहरातील केंद्रीय‎ जल आयोग कार्यालयात झाली.‎ गेल्या तीन दिवसांतच शहराचे‎ कमाल तापमान तब्बल ४.३ अंशांनी‎ वाढल्याचे या नोंदीतून समोर आले.‎

दरम्यान, उष्णतेच्या तडाख्याने‎ सकाळी १० वाजेपासून शहरातील‎ जनजीवन प्रभावित होते. दुपारी तर‎ सर्व प्रमुख रस्ते, महामार्ग निर्मनुष्य‎ होते. बाजारपेठेतील ग्राहकांची‎ संख्या कमी झाल्याने व्यवसायांवर‎ परिणाम झाला आहे.‎

‘मोचा’ वादळाने शोषले बाष्प‎ बुधवारी सकाळी ११ वाजताच तापमानाचा पारा‎ ४३ अंशंावर पोहोचला. नंतर दुपारी १२ ते ४‎ वाजेदरम्यान ४४.८ अंश तापमान नोंदवले गेले.‎ बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोचा‎ वादळाने वातावरणातील बाष्प शोषून घेतल्याने‎ तापमान वाढीचे चटके बसत आहेत.‎

१८ एप्रिलला होते ४३.९ अंश‎ येत्या १३ मे पर्यंत तापमान उच्चांकी राहिल,‎ असा हवामान विभागाचा अंदाज आहे. यापूर्वी‎ १८ एप्रिल रोजी ४३.९ एवढ्या यंदाच्या सर्वाधिक‎ तापमानाची नोंद झाली होती. हे रेकॉर्ड १० मे‎ रोजी मोडले गेले. तज्ज्ञांचा अंदाज पाहता या‎ तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.‎