आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या बंधाऱ्यात सध्या आठवडाभर पुरेल इतका जलसाठा शिल्लक आहे. यामुळे हतनूर धरणातून आवर्तन मिळणार आहे. याबाबत पलिकेने मागणी नोंदवली असून बंधाऱ्यातील जलसाठा संपण्यापूर्वी हतनूर धरणातून आवर्तन मिळणार आहे. शहराला तसेच रेल्वेच्या वसाहतीसाठी तापीपात्रातील बंधाऱ्यात जलसाठा केला जातो. पावसाळ्यानंतर साधारण जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची गरज भासते. सध्या शहर आणि रेल्वेला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात सात दिवसांचा जलसाठा शिल्लक आहे. यंदा परतीच्या पावसामुळे उशिरापर्यंत आवक कायम राहिली. यामुळे तापीतील बंधाऱ्यात जलसाठा असल्याने आवर्तनाची गरज भासली नाही. गेल्या पंधरवड्यातही हतनूर धरणातून ५० क्सुसेस अतिरिक्त पाणी सोडण्यात आले होते.
यामुळे सध्या किमान सात दिवस पुरेल इतका जलसाठा शिल्लक आहे. यामुळे पालिकेने हतनूर धरणाकडे मागणी नोंदवली आहे. या आठवडाभरात हतनूर धरणातून आवर्तन मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे टंचाईचे संकट दूर होईल.तापी पात्रातील बंधाऱ्याची पातळी अशी खालावली आहे.बंधाऱ्यातील साठा संपण्यापुर्वी मिळेल आवर्तन सात दिवस पुरेल इतका जलसाठा शिल्लक असला तरी तो संपण्यापुर्वी हतनूरचे आवर्तन मिळेल, यामुळे कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होणार नाही. हतनूर धरणात यंदा अधिक जलसाठा आहे, यामुळे उन्हाळ्यातही पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होणार नाही. सतीश देशमुख, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, भुसावळ पालिका बंधाऱ्यातील साठा संपण्यापुर्वी मिळेल आवर्तन सात दिवस पुरेल इतका जलसाठा शिल्लक असला तरी तो संपण्यापुर्वी हतनूरचे आवर्तन मिळेल, यामुळे कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होणार नाही. हतनूर धरणात यंदा अधिक जलसाठा आहे, यामुळे उन्हाळ्यातही पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होणार नाही. सतीश देशमुख, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, भुसावळ पालिका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.