आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असंवेदनशील‎ वक्तव्य:काँग्रेसने केला कृषिमंत्री‎ अब्दुल सत्तार यांचा निषेध‎

मुक्ताईनगर‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार‎ यांनी शेतकऱ्यांच्या‎ आत्महत्यांसंदर्भात असंवेदनशील‎ वक्तव्य केले. त्यांचा निषेध आणि‎ सत्तार यांनी राजीनामा द्यावा या‎ मागणीसाठी मुक्ताईनगर तालुका‎ काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना‎ निवेदन दिले.‎ कृषीमंत्र्यांनी शेतकरी हिताचे‎ निर्णय घेणे अपेक्षित अाहे. तसेच‎ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी‎ प्रभावी धोरण ठरवून त्याची‎ अंमलबजावणी करणे अपेक्षित‎ आहे. मात्र, तसे न करता ते शेतकरी‎ आत्महत्या काही नवीन नाहीत.‎

शेतकरी आत्महत्या करतच‎ असतात, अशा स्वरूपाचे निंदनीय‎ व बेजबाबदार विधान मंत्री अब्दुल‎ सत्तार यांनी केले. हा प्रकार म्हणजे‎ राज्याच्या कृषी मंत्र्याने शेतकरी‎ वर्गाची एक प्रकारे केलेली थट्टा‎ आहे, असा आरोप करत‎ मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीने‎ मंत्री सत्तार यांचा निषेध केला.‎ तसेच त्यांना कृषी मंत्रिपदावर‎ राहण्याचा नैतिक अधिकार नाही.‎ अब्दुल सत्तार यांनी त्वरित राजीनामा‎ द्यावा. किंवा त्यांना तात्काळ‎ मंत्रिपदावरून बडतर्फ करावे अशी‎ मागणी करणारे निवेदन काँग्रेस १४‎ मार्चला मुक्ताईनगरच्या‎ तहसीलदारांना दिले. याप्रसंगी‎ काँग्रेसचे पदाधिकारी अॅड.पल्लवी‎ रेणके, अॅड.अरविंद गोसावी,‎ एस.ए.भोई, डॉ.जगदीश पाटील,‎ दिनेश पाटील, बी.डी. गवई, अनिल‎ वाडीले, एन.आर.चव्हाण, सुमन‎ चौधरी, प्रा.सुभाष पाटील, शामराव‎ भोई, निखिल चौधरी, अॅड.रमेश‎ हागे आदींची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...