आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांसाठी लढा:शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किनगावहून‎ धुळ्याकडे निर्धार पदयात्रेचे प्रस्थान‎ ; 110 किमीचा प्रवास, 19ला धुळे येथे समारोप‎

यावल‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी आत्महत्या व शेतकऱ्यांच्या‎ प्रश्नांकडे सरकारचे लक्ष‎ वेधण्यासाठी किनगाव (ता.यावल)‎ ते धुळे या शेतकरी सहवेदना निर्धार‎ पदयात्रोला सोमवारी सुरुवात झाली.‎ किनगाव येथे शेतकरी संघटनेचे‎ खान्देश विभाग प्रमुख स्व.गणेश‎ पाटील उर्फ कडूअप्पा यांना‎ श्रद्धाजली अर्पण करून ही पदयात्रा‎ मार्गस्थ झाली. ती १९ मार्च रोजी‎ धुळे येथे पोहोचून समारोप होईल.‎ शेतकरी संघटनेची सहवेदना‎ आणि निर्धार पदयात्रा यंदा किनगाव‎ ते धुळे अशी निघाली आहे. १३ ते‎ १९ मार्चदरम्यान ही पदयात्रा‎ किनगाव-चोपडा-अमळनेर ते धुळे‎ असा एकुण ११० किलोमीटरचा‎ प्रवास करेल. मुंबई येथील‎ डॉ.राजीव बसर्गेकर हे यात्रेचे मुख्य‎ संयोजक असून परभणी येथील‎ सुभाष कच्छवे यांचेही सहकार्य‎ लाभत आहे.

या पदयात्रेला १३ रोजी‎ सकाळी ९ वाजता किनगाव येथून‎ सुरूवात झाली. तत्पूर्वी किनगाव‎ येथील शेतकरी संघटनेचे दिवंगत‎ नेते गणेश दिनकर पाटील‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎(कडूअप्पा) यांना श्रद्धांजली अर्पण‎ करण्यात आली. माजी आमदार‎ रमेश चौधरी, सरपंच निर्मला‎ पाटील, माजी पं.स.सदस्य उमाकांत‎ पाटील, राम मंदीर संस्थानचे‎ अध्यक्ष के.जे.पाटील, प्रगतशील‎ शेतकरी सुरेश चौधरी, चंद्रकांत‎ चौधरी, डॉ.योगेश पालवे आदी‎ उपस्थित होते. प्रास्ताविक संभाजी‎ वराडे यांनी केले.‎

धुळे येथील समारोपाला यांची राहणार उपस्थिती‎ धुळे येथील समारोपाला विठ्ठलराव डांगे (नांदेड), कालिदास आपेट, सतीश‎ गलांडे (परभणी), ऋतगंधा देशमुख (जळगाव), शामराव धावडे‎ (अमरावती), राजीव बसर्गेकर (नवी मुंबई), रामकिशन आप्पा रुद्राक्ष‎ (जवळाबाजार जि.हिंगोली), तानाजी फडतरे देशमुख, बालाजी आबादार‎ (नांदेड), कालिदास आपेट (गिरवली जि.बीड), नीळकंठ डांगे‎ (जवळाबाजार, जि.हिंगोली), सतीश गलांडे (परभणी), विठ्ठलराज डांगे‎ (कंधार जि.नांदेड), अमर हबीब आणि अनंत देशपांडे उपस्थित राहतील.‎

बातम्या आणखी आहेत...