आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोठ्या विश्वासाने ठेवलेल्या ठेवींची रक्कम मुदत संपूनही परत मिळत नसल्याने ठेवीदार वैतागले आहेत. याबाबत ठेवीदारांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तरीही उपयोग होत नसल्याने ठेवीदारांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील अनेक पतसंस्था बंदच आहेत. त्यामुळे ठेवीदारांनी ठेवीच्या रकमा मागायच्या कुठे? असा प्रश्न ठेवीदारांनी उपस्थित केला आहे. सहकार विभागाकडे देखील तक्रारी केल्यावर उपयोग होत नाही.
यापूर्वी काही पतसंस्थांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याचे आदेश सहकार आयुक्त, महसूल आयुक्तांनी दिले होते. मात्र, हे आदेश धाब्यावर बसवून चौधशी बंद झाली. ही चौकशी सुरू करावी, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे. याबाबत खान्देश ठेवीदार कृती समिती जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.