आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावातावरणातील बदलामुळे शहरात गेल्या पंधरवड्यापासून बालरुग्णांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णालयांमध्ये ओपीडी दुप्पट झाली आहे. यात प्रामुख्याने इन्फ्लूएंझा विषाणूजन्य आजाराचे प्रमाण अधिक आहे. १५ दिवस कफ सिरफ व अॅन्टीबायोटिक औषधे देवूनही ४० टक्के बालरुग्णांचा खोकला थांबत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. बालकांमध्ये अॅडीनो व्हायरसची लागण असल्याचाही संशय आहे. मात्र तब्बल सहा हजार रुपये खर्च असल्याने ही चाचणी केली जात नाही. यामुळे सध्यातरी अॅडीनो व्हायरसचा एकही रुग्ण समोर आला नाही. लक्षणे मात्र इन्फ्लुएंझा व अॅडिनो व्हायरसची असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. ४० टक्के बालरुग्णांना १५ दिवस कफ सिरफ देवूनही खोकला थांबत नसल्याची स्थिती आहे. तर बालकांमध्ये अचानक पांढऱ्या पेशी कमी होणे, उलट्या, डायरिया आदी लक्षणेही आढळून येत आहेत. सध्या बालरुग्णांचे प्रमाण वाढल्याने रुग्णांना वेटींग करावी लागते.
हे उपाय गरजेचे
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. बाहेरचे अन्न तसेच फास्टफूड टाळावे. हात धुण्याची सवय लावावी. बाहेरुन आल्यावर हातपाय धुवावे. सकस आहार घ्या. फळे, पालेभाज्या, अंडी व डाळींचा आहारात समावेश करावा. मुलांना वारंवार ताप, सर्दी होत असेल तर वर्षातून एकदाइन्फ्लूएंझा लस द्यावी.
खोकल्याच्या औषधाचा वापर दुप्पट
खासगी रुग्णालयांसोबतच ;पालिका रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाची ओपडीही दुप्पटीपेक्षा अधिक आहे. शासकीय दवाखान्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण ताप, सर्दी, अंगदूखी, खोकल्याचे आहेत. यामुळे शासकिय रुग्णालयात गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात दुप्पट प्रमाणात खोकल्याचे औषध वापरले जात आहे.
व्हायरलचे रुग्ण अधिक
सध्या बालरुग्णांमध्ये इन्फ्लूएंझा व्हायरलचा आजार वाढला आहे. यात बालरुग्णाला १०१ पेक्षा अधिक ताप असतो, थंडी वाजून येते. हातपायदुखी, हगवण-उलटी आदींचा त्रास होतो. अंगावर पुरळ येणे खोकला वाढणे आदी लक्षणे आहेत.तीन ते सात दिवसांत खोकला व ताप बरा होतो. मात्र काही रुग्णांचा खोकला १५ दिवसांनी बरा होत आहे.- डॉ. पंकज राणे, बालरोग तज्ज्ञ, भुसावळ
भीतीचे कारण नाही
बालरुग्णांना रक्त तपासणीत टायफाॅईड, मलेरिया आढळून येत नाही. तर दुसरीकडे प्लेटलेट कमी होत आहेत. १५ दिवस कफ सिरफ देवूनही बालकांचा खोकला कमी होत नाही.यानंतर आयुर्वेदीक औषधे देवून खोकला नियंत्रणात येतो. अॅडीनो व्हायरसची चाचणी खर्चिक असल्याने केली जात नाही. लक्षणांनुसार उपचार करुन बालरुग्ण बरे होतात. भीतीचे कारण नाही. - डॉ. प्रहिज फालक, आनंद नगर, भुसावळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.