आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांचा उपक्रम:वरणगावातील टंचाईमुळे‎ स्वखर्चातून पाणीपुरवठा‎

वरणगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या २० दिवसांपासून पिण्याच्या‎ पाण्याची टंचाई असल्याने, शिवसेना‎ (ठाकरे गट) शहप्रमुख संतोष माळी यांनी‎ वॉर्डातील नागरिकांना स्वखर्चाने टँकरद्वारे‎ शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा केला.‎ यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.‎ उन्हाळाच्या सुरुवातीलाच वरणगाव‎ शहरात पाणी टंचाईने नागरीकांची‎ अडचण वाढली आहे. शहरातील‎ हातपंपदेखील नादुरुस्त असल्याने‎ पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे.‎ हातपंप वॉर्डावॉर्डात आहे, परंतु ते नादुरुस्त‎ आहे.

याकडे नगरपालिकेने लक्ष दिल्यास‎ टंचाईच्या काळात दिलासा मिळू शकतो.‎ टंचाई संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब‎ ठाकरे पक्षाने नगरपरिषदेत बोंबाबोंब‎ आंदोलन केले. तात्काळ पाण्यासाठी‎ उपाययोजना करण्याची मागणी करत,‎ हंडा मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात‎ आला होता. नागरिकांना पाण्यासाठी‎ भटकंती करावी लागत असल्याने‎ शिवसेना शहप्रमुख संतोष माळी यांनी,‎ शुक्रवारी सकाळी वॉर्डात स्वखर्चाने‎ पाण्याचे टँकर आणून पुरवठा केला.‎

समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष‎ केल्याचा आरोप‎ प्रशासकांच्या काळात वरणगाव‎ नगरपरिषदनेनागर िकांच्या सुविधांकडे‎ दुर्लक्ष केल्याने पाणीटंचाई निर्माण झाली‎ असल्याचा आरोप, संतोष माळी यांनी‎ केला. प्रशासनाने लक्ष घालून‎ वरणगावकरांना समस्येतून मुक्त करावे‎ अशी मागणीही त्यांनी केली.‎

बातम्या आणखी आहेत...