आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील पूर्व भागात शनिवारी रात्री नऊ ते दहा वाजेदरम्यान वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वेल्हाळे, मन्यारखेडा, जाडगाव, साकरी, कठोरा या भागात केळी, मका, गहू आदी पिके भुईसपाट झाली. तर हतनूर येथे विज कोसळून दोन म्हशी दगावल्या. याबाबत पशुवैद्यकीय विभागाने पंचनामे केले. किती क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे झाले याची माहिती मात्र तहसील कार्यालयाकडे उपलब्ध झाली नाही.
किमान ४० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे. अर्धा तास सुरु असलेल्या वादळी पावसामुळे वेल्हाळे भागात सर्वाधिक नुकसान झाले. वेल्हाळे शिवारातील त्रिलोत्तम ढाके, धनराज ढाके, बाळू पंडीत ढाके, हिरामण प्रल्हाद पाटील, गोपाळ पाटील, सुभाष चुडामण पाटील, जितेंद्र ढाके आदी शेतकऱ्यांचे मका पिकआडवे झाले.
दोन म्हशी दगावल्या
हतनूर गावातील सुपडू दयाराम पाटील यांच्या घराजवळच म्हशींचा गोठा आहे. शनिवारी रात्री १२.१५ वाजेच्या दरम्यान घर व गोठ्यावर विज कोसळूनदोन म्हशी दगावल्या. तर घराच्या भिंतीला तडे जाऊन वीज केबलचे नुकसान झाले. मृत म्हशींचे पंचनामेपशुवैद् यकिय अधिकारी डॉ. सतीश तायडे, तलाठी निता झायले यांनी केले, अशी माहिती प्रभारी तहसीलदार महेश पवार यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.