आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळांचा राजा:चार वर्षांनंतर यंदा मार्चमध्ये प्रथमच बदाम,‎ गुलाबखश आंब्याचे दर 140 रुपये किलो‎

भुसावळ‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मार्चच्या अखेरच्या‎ आठवड्यापर्यंत आंब्यांचे दर‎ प्रतिकिलो २८० ते ३०० रुपयांपर्यंत‎ जातात. यंदा मात्र हंगामाच्या‎ सुरुवातीलाच केरळ, तामिळनाडू व‎ आंध्र प्रदेशातून आवक वाढल्याने‎ आंबा १४० ते १६० रुपये किलोने‎ विक्री होत आहे. त्यात अजून‎ घसरण होण्याची शक्यता आहे.‎ शहराच्या बाजारात जानेवारीपासून‎ आंब्याची आवक सुरू होते.‎ मार्चमध्ये हे प्रमाण वाढते.

दरम्यान,‎ गेल्या चार वर्षांपासून मार्च महिन्यात‎ गुलाबकश, बदाम या जातीच्या‎ आंब्यांचे दर प्रतिकिलो २८० ते ३००‎ रुपये किलोपर्यंत असतात.‎ एप्रिलनंतर त्यात घसरण होते. यंदा‎ मात्र पहिल्यांदाच मार्चमध्ये आंध्र‎ प्रदेश, केरळ, तामिळनाडूतून‎ गुलाबखश, बदाम या आंब्यांची‎ आवक वाढल्याने दर केवळ १४० ते‎ १६० रुपये किलोपर्यंत आहेत. मात्र,‎ हापूस आंब्यांचे प्रती डझन १ हजार‎ ते १२०० रुपये दर आहेत. भुसावळात‎ येणारा आंबा नवी मुंबईतील वाशी‎ मार्केटमधून आणला जातो. काही‎ व्यापारी तो विभागात इतरत्र घाऊक‎ बाजारात विकतात.‎

मार्च महिन्यातही ग्राहकांकडून आंब्यांची खरेदी वाढली आहे.‎ ही स्थिती कायम राहिल्यास दर पुन्हा घसरतील‎जास्त उत्पादनामुळे आवक वाढून सुरुवातीलाच दर निम्म्यावर आले‎ आहेत. सध्याचे वातावरण कायम राहिले, नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले‎ नाही तर आगामी काळात आंब्यांचे दर खूपच घसरतील.‎ - रईस बागवान, फळांचे व्यापारी, भुसावळ‎

बातम्या आणखी आहेत...