आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीत विसर्ग‎ सुरू:हतनूर धरणात अजूनही‎ 46  क्युमेक्स आवक‎

भुसावळ‎4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेश व विदर्भातील परतीच्या पावसामुळे हतनूर धरणातील‎ पाण्याची आवक नोव्हेंबर‎ महिन्यातही सुरु आहे.सध्या‎ धरणात ४६ क्युमेक्स पाण्याची‎ आवक होत आहे. यामुळे धरण १०० ‎टक्के भरल्यानंतरही दोन दरवाजे २५ ‎सेंटीमीटरने उघडून नदीत विसर्ग‎ सुरू आहे. विशेष म्हणजे डिसेंबर ‎महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ‎ धरणात पाण्याची आवक काम‎ राहील, असा अंदाज आहे.‎

भुसावळ शहरासह अर्ध्या‎ जिल्ह्याला हतनूर धरणातून‎ पाणीपुरवठा केला जातो. तब्बल ३७‎ हजार हेक्टर जमीन हतनूरच्या‎ उजव्या तट कालव्यामुळे‎ ओलिताखाली येते. यामुळे भुसावळ‎ विभागासाठी हतनूर जलसंजीवनी‎ ठरते. यंदा हतनूर धरण १०‎ ऑक्टोबरपर्यंत वेळेत १०० टक्के‎ भरले.

यानंतरही धरणाच्या पाणलोट‎ क्षेत्रात परतीच्या पावसाने हजेरी‎ लावली होती. मध्य प्रदेशात‎ ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे‎ हतनूरमध्ये पाण्याची आवक‎ अजूनही कायम आहे. सध्या‎ धरणात प्रती सेकंद ४६ क्युमेक्स‎ आवक सुरू आहे.

दोन दरवाजे २५‎ सेंटीमीटरने उघडले आहेत.‎२० नोव्हेंबरनंतर आवर्तन‎ रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून‎ यंदा फेब्रुवारीपर्यंत दर महिन्याला‎ कालव्यातून आवर्तन मिळेल.‎ पहिले आवर्तन १५ नोव्हेंबरला‎ देण्याचा निर्णय झाला होता. मात्र,‎ यावल व चोपडा तालुक्यात काही‎ ठिकाणी पाटचाऱ्या दुरुस्तीचे काम‎ सुरु आहे. पहिले आवर्तन २०‎ नोव्हेंबरनंतर दिले जाईल, अशी‎ माहिती शाखा अभियंता‎ एस.जी.चौधरी यांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...