आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐनपुरात डॉ. जगदीश‎ पाटील यांचे आवाहन‎:शालेय शिक्षणातील संस्कार शिदोरी सोबत ठेवा‎

ऐनपूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञान आणि संस्कारांशिवाय जीवन‎ शून्य आहे. संस्कार व ज्ञानच‎ मनुष्याला श्रेष्ठ बनवते. कोणत्याही‎ व्यक्तीची प्रगती ही त्याच्यावर‎ झालेल्या संस्कारावर आणि त्यांनी‎ मिळविलेल्या ज्ञानावर अवलंबून‎ असते. समाजहित तसेच देशहित‎ सांभाळण्यासाठी संस्काराची शिदोरी‎ प्रत्येकाने जोपासली पाहिजे. त्यामुळे‎ शालेय जीवनात मिळालेली ही‎ संस्कार शिदोरी आयुष्यभर पुरणारी‎ असून ती सोबत ठेवण्याचे‎ आवाहन, बालभारतीच्या मराठी‎ भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.‎ जगदीश पाटील यांनी केले.‎ ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई‎ पटेल विद्यालयातील दहावी व‎ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी‎ आयोजित निरोप समारंभात ते‎ बोलत होते. कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी संस्था संचालक तथा‎ बलवाडी शाळेचे मुख्याध्यापक एन.‎ व्ही. पाटील होते.

प्राचार्य‎ आर.जे.पाटील, उपमुख्याध्यापक‎ एस.डी.चौधरी, पर्यवेक्षक‎ पी.आर.महाजन, प्रा.जी.यू. कंखरे,‎ प्रा.जे.डी.महंत, स्थानिक शिक्षक‎ संघटनेचे अध्यक्ष जी.आर.‎ महाजन, डी.बी. चौधरी उपस्थित‎ होते. डॉ. जगदीश पाटील यांचा‎ परिचय वाय.आर. महाजन यांनी‎ करून दिला. विद्यार्थ्यांशी संवाद‎ साधताना डॉ. जगदीश पाटील‎ म्हणाले की, मनुष्य प्राणी सर्वश्रेष्ठ‎ बुद्धिमान व अनेक विचारांचा‎ निर्माता आहे. ज्ञानाच्या कौशल्याने‎ विविध क्षेत्रात तो प्रगती करू‎ शकतो. शिक्षणाचे उद्दिष्ट हे‎ व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास‎ साधणे असा अाहे. त्यासाठी उपजत‎ व संपादित क्षमता व कौशल्ये प्राप्त‎ करण्याची गरज आहे, असे त्यांनी‎ सांगितले. अध्यक्षीय मनोगतात‎ एन.व्ही. पाटील यांनी भविष्यकालीन‎ शिक्षणविषयक माहितीचा वेध घेवून‎ विद्यार्थ्यांनी त्यासाठी आवश्यक ती‎ तयारी करावी, असे सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...