आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:राष्ट्रवादीने केले 50 खोक्यांचे दहन‎

मुक्ताईनगर‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील व केंद्रातील सरकार‎ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अपयशी‎ ठरले. कापूस, कांद्याला भाव‎ नाही, केळी पीक विम्याचा,‎ केळीवरील सीएमव्ही रोगाचा प्रश्न‎ सरकारने योग्य पद्धतीने हाताळला‎ नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या‎ शेतकऱ्यांना ५० हजार रुपये‎ प्रोत्साहनपर अनुदान अजून‎ मिळाले नाही. गॅस दरवाढ होत‎ असून महागाई वाढत आहे. अशा‎ विविध प्रश्नांवर सरकार अपयशी‎ ठरल्याने हे विविध प्रश्न खोक्यांवर‎ लिहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या‎ ५० खोक्यांची होळी केली.‎ यावेळी रोहिणी खडसे यांनी‎ होळीचे पूजन केले. तर माजी‎ महसूल मंत्री आमदार एकनाथ‎ खडसे यांच्या हस्ते होळी‎ पेटवण्यात आली.

उपस्थित‎ कार्यकर्त्यांनी ५० खोके, एकदम‎ ओके, शेतमालास भाव न देणाऱ्या‎ सरकारचा निषेध असो, अशा‎ घोषणा दिल्या. यावेळी सभापती‎ निवृत्ती पाटील, राकाँ तालुकाध्यक्ष‎ यू.डी. पाटील, विधानसभा क्षेत्र‎ प्रमुख विजय सोनार, शहराध्यक्ष‎ राजेंद्र माळी, बबलू सापधरे, माजी‎ सभापती विलास धायडे, जि.प.‎ सदस्य नीलेश पाटील, प्रवीण‎ पाटील, मस्तान कुरेशी, बापू‎ ससाणे, अनिल पाटील, एजाज‎ खान, रामभाऊ पाटील, सुनील‎ काटे अादी उपस्थित होते.‎

सरकार अपयशी; जनता त्रस्त : खडसे
राज्यातील सरकार सर्व प्रश्नांवर अपयशी ठरत असून जनता त्रस्त आहे.‎ होळीत आपण सर्व निराशा व वाईट गोष्टींचे दहन करतो. त्यामुळे ही ५०‎ खोक्यांचे जळमटे होळीत जाळून टाकण्यासाठी या प्रतीकात्मक होळीचे‎ आयोजन केल्याचे खडसे यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...