आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य शासनाने १०० रुपयांत चार वस्तूंचे किट दिले होते. यानंतर नवीन वर्षात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना केंद्र सरकारने बंद केली. त्यामुळे स्वस्त दरात मिळणारे गहू आणि तांदूळ वाटप होणार नाही. त्याऐवजी लाभार्थींना रेशनचे धान्य मोफत देण्यात येईल. शहरासह तालुक्यातील १ लाख ५३ हजार ९७० लाभार्थींना याचा लाभ मिळेल. कोरोना महामारीच्या काळात गरिबांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने रेशन दुकानांतून मोफत धान्याचे वाटप केले. कोरोनानंतर सुद्धा ही योजना सुरू होती. गेल्या वर्षभर या योजनेंतर्गत लाभार्थींना मोफत धान्य वाटप झाले. सोबतच २ रुपये प्रति किलो गहू आणि ३ रुपये प्रति किलो तांदूळ वितरित करण्यात येत आहे. ही याेजना राज्य सरकारने सुरू केली आहे. आता प्रधानमंत्री गरीब कल्याण याेजना केंद्र सरकारने बंद केल्याने राज्याने नवीन योजना आणली.
लाभार्थिंचे ठसे स्कॅन न झाल्यास ओटीपी पर्याय काही लाभार्थींच्या बोटांचे ठसे ई-पॉस मशीनवर स्कॅन होत नाहीत.अशा लाभार्थींनी आधारकार्डसोबत लिंक असलेला मोबाइल क्रमांक रेशन दुकानदाराकडे द्यावा. दुकानदार तो क्रमांक ई-पॉस मशीनवरीलओटीपी या पर्यायावर नोंद करतील. यानंतर संबंधित लाभार्थीच्या मोबाइलवर ओटीपी प्राप्त होईल.यामुळे लाभार्थीला धान्य मिळेल. -दीपक धिवरे,तहसीलदार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.