आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या अनेक वर्षांपासून घरपट्टी, पाणीपट्टी न भरणाऱ्या थकबाकीदारांमुळे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात अडीच कोटी रुपयांची थकबाकी वसुलीचे आव्हान येथील पालिकेसमोर आहे. बुधवारी तीन पतसंस्थांच्या कार्यालयांसह नऊ व्यापारी गाळे सिल करण्यात आले. आता यापुढे कर भरणा न करणाऱ्यांच्या घरासमोर ढोल वाजवून करवसुली करण्यात येणार आहे. मालमत्ताकर व पाणी पट्टी कर वसुलीसाठी प्रत्येक भागांमध्ये लाऊड स्पीकरद्वारे नागरिकांना आपल्या करांच्या रकमा वेळेत भरा, अन्यथा मालमत्ता जप्तीची कारवाई होईल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे काही प्रमाणात का होईना, कर वसुली होण्यास मदत होणार आहे. कर वसुलीसाठी ५ विभाग व त्याअंतर्गत ६ पथके स्थापन करण्यात आली आहेत. बुधवारी संभाजी चौक परिसरातील सावदा मर्चंट को-ऑप. सोसायटीकडे १ लाख ९९ हजार रुपये थकबाकी, दुर्गामाता चौक परिसरातील लोकसेवा पतसंस्थेकडे २ लाख ४ हजार तर महावीर चौक परिसरातील तापी पतसंस्थेकडे ६४ हजार रुपये असलेली थकबाकी न भरल्याने त्यांची कार्यालये सिल करण्यात आली. तसेच दुर्गा माता रोडवरील राणे-भंडारी शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळे क्रमांक ७, ९, १०, ११, १४, १५, १८, १९ व २२ क्रमांकाचे गाळे सिल करण्यात आले. मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात बुधवारी सकाळी ११ वाजता ही कारवाई करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.