आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालिकेच्या तापी नदीतील साठवण बंधाऱ्यात केवळ १० दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. मध्यंतरी धरणाचे काही गेट उघडून तापी नदीत पाणी सोडले होते. मात्र, हे पाणी अजून बंधाऱ्यात पोहोचलेच नाही. त्यामुळे भुसावळकरांना टंचाईला ताेंड द्यावे लागू शकते. तापी पात्रात पालिकेचा बंधारा आहे. त्यातून पाण्याची उचल करून ते जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथे जलशुद्धीकरण प्रक्रिया झाल्यावर पाणी शहरात पुरवले जाते.
पालिकेच्या साठवण बंधाऱ्यातील पाणीसाठा किमान ३५ दिवस पुरतो. त्यातील साठा संपल्यावर हतनूर धरणातून आवर्तन मागवले जाते. दरम्यान, पालिकेच्या बंधाऱ्यात आता केवळ १० दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. दुसरीकडे पालिकेने अजूनही आवर्तनाची मागणी केलेली नाही. सहा दिवसांपूर्वी हतनूर धरणातून अल्पप्रमाणात तापी नदीत विसर्ग झाला होता. हे पाणी बंधाऱ्यात येऊन साठा वाढेल व तो जानेवारीपर्यंत पुरेल असा पालिकेचा अंदाज होता. पण तसे झालेच नाही.
आवर्तनाची मागणी
येत्या चार दिवसात आम्ही पाटबंधारे विभागाकडे आवर्तनाची मागणी करणार आहोत. आवर्तन सुटताच बंधारा पूर्ण क्षमतेने भरून पुढील ३५ दिवसांचा साठा उपलब्ध होईल. तोपर्यंत पाणी जपून वापरा.- सतीश देशमुख, पाणी पुरवठा अभियंता, पालिका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.