आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी शहरात ८ आणि ग्रामीण भागात ४ असे एकुण १२ केंद्र आहेत. तेथे एकूण ४,५३६ विद्यार्थी परीक्षा देतील. ही परीक्षा देताना विद्यार्थ्यांना हॉलमध्ये केवळ पेन, पॅड, पाण्याची बाटली आणि कंपास पेटी इतकेच साहित्य नेता येईल. काही माहिती लिहिण्यासाठी कोरा कागद देखील सोबत नेता येणार नाही. गुरुवारी परीक्षेला सुरूवात होणार असल्याने बुधवारी नियोजित केंद्रावर बैठक क्रमांक टाकण्यात आले. त्यामुळे सकाळी बैठक क्रमांक सूची पहाण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांबाहेर गर्दी केली हाेती. तत्पूर्वी, कस्टोडियन दुसाने यांनी मंगळवारीच सर्व परीक्षा केंद्र प्रमुखांची बैठक घेतली.
त्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी? बोर्डाकडून आलेल्या सूचनांची माहिती दिली. दरम्यान, दहावीच्या परीक्षेसाठी शहरात ७ तर वराडसिम येथे एक असे ८ केंद्र आहेत. या ८ केंद्रांवर ३,३५१ विद्यार्थी २ ते २५ मार्च या कालावधीत परीक्षा देतील. तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय, आयुध निर्माणी वरणगाव शाळा, गंगाधर सांडू चाैधरी विद्यालय आणि सर्वाेदय माध्यमिक विद्यालय किन्ही येथेही परीक्षा केंद्र आहे. सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे.
११ वाजता आला तरी प्रवेश
एखादा विद्यार्थी सकाळी ११ वाजता सेंटरवर आला तरी त्याला आत प्रवेश मिळेल. मात्र ११.३० वाजेनंतर त्याला पेपरला बसता येणार नाही.कारण प्रश्नपत्रिका वाटून झाल्यावर उरलेल्या प्रश्नपत्रिका तत्काळ सील करण्यात येतील. विद्यार्थ्यांना खूप मोठी समस्या आली असेल तर त्याला जवळील केंद्रावर पेपर देता येईल.मात्र, ही विशेष बाब असेल.
असे असेल नियाेजन
परीक्षार्थींनी यांनी १०.३० पर्यत शाळेत हजर राहावे, १०.५० वाजता उत्तर पत्रिका दिली जाणार आहे. ११ वाजता परीक्षार्थींना प्रश्न पत्रिका दिली जाणार आहे.त्यानंतर त्यांना पेपर लिहीण्यास सुरूवात करता येणार आहे.११ ते २.१० इतका वेळ विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.२.१० वाजेचा उत्तर पत्रिका जमा केली जाणार आहे.
या वस्तू नेण्यास मज्जाव
परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये जाताना कोरा कागद,कॅल्युलेट र,माेबाइल, इलेक्ट्राॅनिक्स घड्याळ या वस्तू नेण्यास मज्जाव असेल. फक्त कंपास,पेन, पाण्याची बाटली,पॅड, हाॅल तिकीट(रिसिट), शाळेचे आेळखपत्र सोबत नेता येईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर तसेच पुरवणी उत्तर पत्रिकेवर ठरावीक रकान्यात बैठक क्रमांक अंकात व अक्षरात बिनचूक लिहून स्वाक्षरी करावी. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका मिळाल्यावर व पर्यवेक्षकाकडे जमा करताना ती सुस्थितीत आहे किंवा नाही? याची खातरजमा करावी. उत्तरपत्रिका पान ३ पासून उत्तर लिहिण्यास प्रारंभ करा. उत्तरपत्रिकेच्या दोन्ही बाजूने नव्हे तर फक्त डाव्या बाजूने समास साेडावा.प्रत्येक पानाच्या दोन्ही बाजूस लिहावे. उत्तरपत्रिका किंवा पुरवणी उत्तरपत्रकेचे काेणतेही पान फाडू नये. ही कृती शिक्षापात्र आहे, याची नोंद घ्यावी.
पर्यवेक्षकाकडून घेतलेल्या उत्तरपत्रिकेवर व पुरवणीवर पर्यवेक्षकाची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी. उत्तरपत्रिकेला जाेडलेल्या पुरवण्याची संख्या उत्तरपत्रिकेवर पहिल्या पानावर विद्यार्थ्यांनी बिनचूक लिहावी, त्यात चूक करू नये. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर वरील भागात प्रत्येक पानावर उजव्या बाजूला स्वत:चा बैठक क्रमांक लिहावा. निर्धार ीत १० मिनिटात फक्त प्रश्नपत्रिकेचे वाचन करावे, मनात भीती बाळगू नये. कच्चे लिखाण करावयाचे असल्यास ते पेन्सिलने आणि उत्तर पत्रिकेच्या डाव्या हाताच्या पानावर करावे.त्या पाना वर कच्चे लिखाण असा स्पष्ट उल्लेख करावा.सुटा कागद, प्रश्नपत्रिकेवर कच्चे लिखाण करू नये. परीक्षार्थींनी उत्तराचा काही भाग खोडला असेल. त्याला शाईत बदल करावा लागला असेल,अशा ठिकाणी पर्यवेक्षकांची स्वाक्षरी घ्यावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.