आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुऱ्हे पानाचे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचारच समाजाला पुढे नेऊ शकतात. समाजामध्ये जे मुलींनी आपल्या शिक्षणातून, कर्तृत्व सिद्ध केले ते फक्त आणि फक्त सावित्रीबाई यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळेच. कारण प्रसंगी दगड, विटांचा मार सहन करूनही सावित्रीबाई डगमगल्या नाही, असे ज्योत्स्ना जाधव यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनावर एक गीत सादर केले. भुसावळ येथील माळी भवन येथे मंगळवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त महिला भगिनींचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्या नंतर फुले दांपत्याच्या अतुलनीय सामाजिक कार्याची माहिती देणारी ओवी सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्योत्स्ना जाधव, अर्चना बंड यांनी सावित्रीबाई यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष चारुलता महाजन, वर्षा महाजन, नयना महाजन, योगिता चौधरी, सरला महाजन, मालती महाजन, नीता महाजन, मनीषा वानखेडे, विशाखा महाजन, दीपाली माळी, लीलाबाई माळी, देवयानी महाजन, पल्लवी महाजन, ज्योत्स्ना जाधव, उज्वला देवरे, साक्षी महाजन यांच्यासह भगिनी उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.