आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीची परीक्षा:कॉपी पुरवणाऱ्या तिघांना दिला प्रसाद,‎ पेपर संपेपर्यंत तीन तास ठेवले बसवून‎

भुसावळ‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सात आणि तालुक्यात वराडसीम येथे‎ एक अशा आठ परीक्षा केंद्रांवर गुरुवारपासून‎ दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. एकूण २६२३‎ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होते. मात्र ३९‎ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली, प्रत्यक्षात‎ २५८४ विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला. शहरात‎ म्युनिसीपल हायस्कूलच्या परीक्षा केंद्रात कॉपी‎ पुरवण्यासाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी‎ पकडून प्रसाद दिला. तसेच तिघांना पेपर‎ संपेपर्यंत परीक्षा केंद्राच्या आवारात बसवून‎ ठेवले होते. पेपर आटोपल्यानंतर समज देत‎ तिघांना पोलिसांनी सोडले.‎ पहिल्याच मराठीच्या पेपरला परीक्षा‎ केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त असला,‎ तरी आतून काॅप्या सुरू असल्याचे विद्यार्थ्यांनी‎ पेपर सुटल्यावर सांगितले.

बाहेरून काॅप्या‎ देण्यासाठी येणाऱ्यांना पाेलिसांनी काठीचा‎ प्रसाद दिला. सकाळी १०.३० वाजताच विद्यार्थी‎ परीक्षा केंद्रांवर पाेहोचले हाेते. प्रत्येक परीक्षा‎ केंद्रावर चोख बंदोबस्त असूनही काॅपी बहाद्दर‎ हे काॅप्या पुरविण्यासाठी आटापीटा करत होते.‎ मात्र, मराठीच्या पेपरला तालुक्यात एकही‎ कॉपी केस झाली नसल्याचे शिक्षण विभागाच्या‎ सूत्रांनी सांगितले.‎

आेळखपत्र नेण्यास मज्जाव, डमी परिक्षार्थी केंद्रात शिरण्याची भीती केली व्यक्त‎
शहरातील एका शाळेत परीक्षार्थींना त्यांच्या शाळेचे आेळखपत्र वर्गात नेण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांचे आेळखपत्र‎ हे बाहेरच काढून ठेवायला लावले.यामुळे डमी विद्यार्थी पेपर देऊ शकताे, अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. बाेर्डाने‎ याबाबत सूचना दिलेल्या असूनही ओळखपत्राला मनाई करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.‎

परीक्षा केंद्रात शिरकाव‎
डी.एस. हायस्कूलमधील परीक्षा‎ केंद्रावर परीक्षार्थींना काॅपी‎ पुरवण्यासाठी, अनेकजण‎ डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यातून‎ शिरकाव करतात. उद्यानाला कुलूप‎ लावल्याने काही काॅपी बहाद्दर‎ पंचायत समितीच्या आवारातून‎ उद्यानात उडी मारतात. तर काही‎ जण उद्यानाच्या बाजूला असलेल्या‎ तारेचे कुंपणातून आत जातात.‎ तसेच म्युनिसीपल हायस्कूलमध्ये‎ मागील बाजूने काॅप्या पुरवणाऱ्यांची‎ गर्दी झाली होती. तेथे पोलिसांनी‎ दुचाकीवर गस्त केली. तरीही कॉपी‎ पुरवणाऱ्यांचे टोळके पोलिसांना न‎ जुमानता, परीक्षा केंद्रात शिरण्याचा‎ प्रयत्न करत होते. पोलिसांनी‎ काहींना पकडून प्रसाद दिला.

‎गोंधळाचा त्रास जाणवला‎
उत्तरपत्रिकेतील सूचनांचे वाचन‎ करून पेपर लिहिण्यास सुरूवात‎ केली.बाहेरून आेरडणाऱ्यांचा त्रास‎ हाेता,मात्र तिकडे लक्ष न देता पेपर‎ पूर्णपणे साेडवल्याने पेपर सोपा गेला.‎ -हेमंत डाेके , विद्यार्थी, भुसावळ‎

पेपर वेळेपूर्वीच झाला
‎पेपर लिहिण्यासाठी पूर्ण वेळ‎ मिळाला.वेळ संपण्यापुर्वीच सर्व उत्तरे‎ लिहून झाली हाेती.जी उत्तरे आधी‎ आठवली ती तात्काळ लिहून घेतली.‎ त्यामुळे अडचण आली नाही.‎ -ललिता काेलते , विद्यार्थिनी, भुसावळ‎

बातम्या आणखी आहेत...