आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकवयित्री बहिमाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि यावल महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने, आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेचे आयोजन झाले. २७ फेब्रुवरी ते ४ मार्च या काळात झालेल्या कार्यशाळेत डॉ. सचिन देशमुख यांनी मार्गदर्शन केले. महिलांनी आहार आणि आरोग्याबाबत जागरुक राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. अविनाश दहिफळे यांनी सायबर गुन्ह्यांवर मार्गदर्शन केले.
रेखा देशमुख यांनी विद्यार्थीनींना स्वयंरोजगारातून आत्मनिर्भर होण्याचे मार्गदर्शन केले. तर शेखर पाटील यांनी डिजिटल बँकिंग व्यवहार काळाची गरज आहे असे सांगितले. कार्यक्रमात कैलास बारेला यांनी कृषी विषयक विविध योजना, कृषी अवजारे तसेच सेंद्रीय शेती या विषयावर भर दिला. युवतींनी ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशन, आय.डी.बी.आय बँक आणि कृषी विभागाला क्षेत्रभेट दिली. समारोप प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.