आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने अॅड.रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड, चिखली, मन्यारखेडा, रुईखेडा येथील ग्रामस्थांशी संवाद साधला रुईखेडा परिसरातील गावांची जास्तीस्त जास्त शेती कोरडवाहू आहेय या गावांमधील शेतीला पाणी मिळावे, यासाठी आमदार एकनाथ खडसे यांनी मुक्ताई उपसा सिंचन योजना राबवली. या योजनेचे ९० टक्के काम पूर्णत्वास आले आहे.
परंतु सरकार गेल्यामुळे या कामाला ब्रेक लागला. आगामी काळात माजी मंत्री खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पाठपुरावा करून लवकरच मुक्ताई उपसा सिंचन योजनेचे पाणी रुईखेडा परिसरातील शेतीपर्यंत आणले जाईल. यातून हा परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी संवाद यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे, माजी जि.प.सदस्य नीलेश पाटील, माजी सभापती विलास धायडे, प्रदीप साळुंखे, यात्रा सहप्रमुख रामभाऊ पाटील, चंद्रकांत बढे, सरचिटणीस सुनील काटे, नंदकिशोर हिरोळे, विजय भंगाळे, विनोद काटे, बाळा भालशंकर, राहुल पाटील, विजय कापसे, योगेश पाटील, सुभाष खाटीक, प्रकाश खोंदले, सोनू पाटील, विशाल रोटे, चंद्रशेखर बढे, विजय भंगाळे, प्रेमचंद बढे, चंद्रकांत बढे, बाबुराव पाटील, वासुदेव घाडगे, अतुल पाटील, विजय पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी संवाद यात्रेचे स्वागत केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.