आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील कोरपावली येथील शेतकऱ्याच्या बारा महिन्यांच्या उसाच्या पिकाला शॉर्टसर्किट हाेवून आग लागली. त्या आगीत संपूर्ण ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास या आगीच्या घटनेने हिरावला आहे. याबाबत राज्य महावितरण कंपनीच्या दहिगाव कक्षाला माहिती देण्यात आली असून अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी करून माहिती घेतली. कोरपावली येथील नीळकंठ हरी अडकमोल यांनी बटाईने केलेल्या शेतात उसाची लागवड केली होती. गावापासून तीन कि.मी. अंतरावर त्यांच्या उसाच्या शेतात शॉट सर्किटमुळे अचानक आग लागली.
बघता बघता आगीने राैद्र रूप धारण केल्याने संपूर्ण ऊस जळून खाक झाला. बारा महिने मशागत व मेहनत करून पिकवलेला हा ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे. या घटनेत संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याबाबत राज्य महावितरण कंपनीच्या दहिगाव कक्षाचे अभियंता धांडे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. शेतकऱ्याने यावेळी तक्रार अर्ज दिल्यानंतर या घटनास्थळ, नुकसानीचा पंचनामा केला जाणार असल्याचे वीज महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.