आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन‎:जीवनमुक्तीचा अंतिम मार्ग‎ हरिनाम संकीर्तनातून जाताे‎

भुसावळ‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनमुक्तीचा अंतिम मार्ग हरिनाम संकिर्तन‎ अाहे, असे विचार डाॅ. रेखा पाटील यांनी व्यक्त‎ केले. जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाची‎ साप्ताहिक सभा संघाचे अध्यक्ष आर. आर.‎ बावस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.‎ "कलियुगात हरीनाम संकीर्तन’या विषयावर‎ त्यांनी प्रवचन दिले. कलियुगात स्वतःचा उद्धार‎ करायचा असेल, मुक्ती प्राप्त करायची असेल‎ तर त्यासाठी केवळ एकच मार्ग आहे ताे म्हणजे‎ हरिनाम संकीर्तन. मुक्ती म्हणजे जन्म, मृत्यू,‎ जरा आणि व्याधी या चार प्रकारच्या‎ दुःखापासून मुक्ती. या चार गोष्टी‎ जीवात्म्यासाठी स्वाभाविक नाहीत.

जीवात्मा‎ नित्य आहे. शरीराचा नाश झाल्यानंतर सुद्धा‎ जीवात्मा नष्ट होत नाही. त्याला दुसरे शरीर‎ प्राप्त होते. आपण सर्वजण नित्य, शाश्वत‎ आहोत. भगवंत देखील शाश्वत आहेत.‎ भगवंत सांगतात. आता तुम्ही जन्म-मृत्यूच्या‎ चक्रात फसलेला आहात. या भयावह चक्रातून‎ तुम्ही मुक्त होऊन माझ्या शाश्वत धामात परत‎ या. हीच खरी मुक्ती आहे, असे त्या म्हणाल्या.‎

जीवन क्षणभंगूर : बावस्कर‎ जीवन क्षणभंगूर असून त्याला अध्यात्माची‎ जोड दिली तर ते जगल्याचे सार्थक होते.‎ सर्वांनी दिवसातून एक वेळ पाच मिनिटे हरिनाम‎ करावे, असा सल्ला त्यांनी दिला. पोपटराव‎ पाटील यांनी आभार मानले. पसायदान आणि‎ राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.‎ कार्यक्रम यशस्वितेसाठी कोषाध्यक्ष शांताराम‎ बोबडे व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...