आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सप्टेंबर महिन्यात मुक्ताईनगर दौऱ्यावर आले होते. त्यांनी सीएमव्ही रोगाबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. सरकारने समस्यांचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना वीजबिल माफ करावे, अशा मागणीचे निवेदन मुक्ताईनगर तहसीलदारांना राष्ट्रीय काँग्रेसने दिले. कापूस, कांदा, टोमॅटो व इतर पिकांना भाव नाही. केळी उत्पादक शेतकरी सी.एम.व्ही.रोगाच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत.
रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले आहेत आणि रासायनिक खते वेळेवर मिळत नाही. मजुरांची टंचाई जाणवते आहे. त्यामुळे सरकारने या सर्व समस्यांचा गांभीर्याने विचार करून सरसकट शेतकऱ्यांना वीजबिल माफ करावे, अशी मागणी मुक्ताईनगर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल वाडीले, अंतुर्ली शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख भैय्या शे. करीम, सोनू सिंग, नारायण पाटील, प्रकाश कोळी, सुनील पाटील, देवराम पाटील, रामदास पाटील, भास्कर सोनवणे, विजय दुट्टे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.