आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील राष्ट्रीय महामार्गावरील सुभाष गॅरेज, नाहाटा चौफुली ते रेल्वे उड्डाणपूल परिसरातील पथदिवे गेल्या दोन दिवसांपासून २४ तास सुरु आहेत. यामुळे विजेची नासाडी होत आहे. दुसरीकडे सर्व्हिस रोडवरील अनेक दिवे बंद असल्याने पादचाऱ्यांना त्रास होतो. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्यांची समस्या वाढली आहे. महामार्गावरील पथदिवे सकाळी लवकर बंद केले जातात. तर सायंकाळी उशिराने सुरु होतात. ही बाब नित्याची आहे. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाहाटा चौफुली, सुभाष गॅरेज, रेल्वे उड्डाणपुलादरम्यानचे दिवे सलग २४ तास सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.