आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल येथे आयोजन, योजनेबद्दल दिली माहिती‎:जलजीवन मिशनसाठी 13 गावातील प्रतिनिधींना प्रशिक्षण‎

यावल‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १३ गावांतील‎ लोकप्रतिनिधी, आशासेविका,‎ सेवाभावी जल संरक्षक, बचत‎ गटातील महिलांना दोन दिवस‎ जीवन मिशन अंतर्गत प्रशिक्षण‎ देण्यात आले. यामुळे ग्रामीण‎ भागातील जल व्यवस्थापन सक्षम‎ होण्यास मदत होईल. यावल‎ शहरातील मेहतर सामाजिक‎ सभागृहात हा प्रशिक्षण वर्ग पार‎ पडला.‎ राज्याचे पाणी व स्वच्छता मिशन‎ कक्ष, मुंबई आणि जिल्हा परिषदेच्या‎ अंतर्गत ग्रामस्तरीय भाग‎ धारकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण‎ आयोजित केले होते. जलजीवन‎ मिशन मुख्य संसाधन संस्था‎ राष्ट्रविकास ॲग्रो एज्युकेशन‎ अमळनेरकडून मार्गदर्शन करण्यात‎ आले.

पाडळसे, कोसगाव, वनोली,‎ दुसखेडा कासवा, पिळोदा बुद्रुक,‎ अंजाळा, चिखली खुर्द, चिखली‎ बुद्रुक, भालोद, म्हैसवाडी,‎ बामणोद, आमोदा या १३ गावातील‎ ग्रामपंचायत स्तरातील ग्रामीण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाणीपुरवठा व स्वच्छता समिती,‎ सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक,‎ अंगणवाडी सेविका, आशा वर्कर,‎ जलसंरक्षक, स्वच्छताग्रही, महिला‎ बचत गट प्रतिनिधी या पैकी ५‎ लोकांना त्यात प्रवेश होता.‎ प्रशिक्षणात तांत्रिक, सामाजिक व‎ आर्थिक बाबींबद्दल माहिती देण्यात‎ आली. प्रशिक्षक म्हणून विजय‎ कोळी, सुभाष देठे, नीलेश पगारे,‎ अक्षय भोई, अजय बढे, जगदीश‎ डोळे यांनी काम पाहिले.‎ प्रशिक्षणानंतर धनंजय चौधरी यांच्या‎ हस्ते प्रमाणपत्र वाटप झाले.‎

गावाचे नकाशे तयार‎ या प्रशिक्षणात सहभागींनी आपल्या‎ गावाचे नकाशे तयार केले. तसेच‎ आपल्या गावात ही योजना कशी‎ कार्यान्वित येईल. ती यशस्वी कशी‎ होईल? या संदर्भात नियोजन केले.‎ तसेच जल जीवन मिशनमधून ज्या‎ कुटुंबांना नळ जोडणी मिळेल. त्यांना‎ दररोज नळाद्वारे ५५ लिटर पाणी‎ उपलब्ध करून देण्याची तरतूद‎ असल्याचे सांगण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...