आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर भारतात पडणारी थंडी व धुक्यामुळे भुसावळकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. लेट लतिफ गाड्यांमुळे प्रवाशांना तासनतास स्थानकांवर ताटकळत बसावे लागत अाहे. शनिवारी मुंबई मेल २.२० तास, पवन एक्स्प्रेस २, दानापूर पुणे एक्स्प्रेस ३० मिनिटे, हमसफर एक्स्प्रेस २.४०, ताप्ती गंगा एक्स्प्रेस ३.३०, काशी एक्स्प्रेस ५.३० तास नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने धावत हाेत्या.
गेल्या महिन्यात उत्तर भारतातून भुसावळकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावत हाेत्या. त्यामुळे प्रवासाचा खोळंबा झाला होता. हे वेळापत्रक पूर्वपदावर येण्यापूर्वीच आता पुन्हा एकदा गाड्या उशिराने धावणे सुरू झाले आहे. यामुळे भुसावळ विभागातील प्रवासी वैतागले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.