आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहतनूर धरणातून विसर्ग कमी झाल्याने तापी नदीचा पूर ओसरला आहे. परिणामी पालिकेचे रॉ वॉटर केंद्र नदीतून ताशी पाण्याची उचल वाढवणार आहे. गाळाचे प्रमाण कमी झाल्यावर ही उचल नेहमीसारखी ताशी ११ लाख लिटरपर्यंत जाईल. यामुळे सध्या आठ ते नऊ दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा कालावधी आणखी कमी होईल.
शहरातील जलस्रोत असलेल्या तापी नदीतील बंधाऱ्यात हतनूर धरणातील विसर्गामुळे गाळाची आवक झाली होती. यामुळे रॉ वॉटर यंत्रणेतून ताशी ११ लाख लिटर ऐवजी ८ लाख लिटर पाणी उचल करावी लागत होती. सध्या नदीचा पूर ओसरला असला तरी पाण्यातील गाळाचे प्रमाण कायम आहे. यामुळे पालिकेचे रॉ वॉटर केंद्र तासाला ८ लाख लिटर पाणी उचलत आहे. नदीच्या पुरातील गाळाचे प्रमाण कमी झाल्यावर ही उचल वाढवली जाणार आहे. तूर्त गाळमिश्रित पाणी शुद्ध करण्यासाठी पालिकेने अॅलमचा वापर काही प्रमाणात वाढवला आहे.
आठ दिवसांआड पाणी
उन्हाळ्यात पाण्याची मागणी जास्त, तर पावसाळ्यात कमी असते. कूपनलिकांची पातळी देखील वाढली आहे. यामुळे सध्या तरी पाणीपुरवठ्याच्या तक्रारी नाहीत. काही भागात दहा तासांऐवजी आठ तास, तर कुठे आठऐवजी सहा तास पाणीपुरवठा करून रोटेशन आठ दिवसांवर आणण्याचे प्रयत्न आहे.
सतीश देशमुख,
पाणीपुरवठा अभियंता, भुसावळ पालिका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.