आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंथन:डिजिटल इंडियाच्या लाभांवर कार्यशाळा‎ ; विद्यार्थ्यांचा मिळाला उत्तम प्रतिसाद‎

अमळनेर‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत‎ महोत्सवानिमित्त कवयित्री बहिणाबाई‎ चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ‎ प्रायोजित, तसेच श्रम साफल्य‎ एज्युकेशन संचलित पंडित‎ जवाहरलाल नेहरू समाजकार्य‎ महाविद्यालयात, विद्यार्थी विकास‎ विभागाच्या संयुक्त विद्यमाने‎ विद्यापीठ स्तरीय //"डिजिटल इंडिया‎ चे फायदे’ या विषयावर कार्यशाळा‎ झाली.‎ डॉ.संदीप नेरकर यांच्याहस्ते‎ उद्घाटन झाले. सोसायटीचे‎ संचालक अभिजीत भांडारकर‎ उपस्थित होते. छत्रपती शिवाजी‎‎‎‎‎‎‎‎‎‎ महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या‎ प्रतिमेस अभिवादन व माल्यार्पण‎ करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.‎ प्रास्ताविक प्रा.डॉ.जगदीश सोनवणे‎ यांनी केले. उद्घाटक डॉ. संदीप‎ नेरकर यांनी विचार मांडले. प्राचार्य‎ डॉ.पी.एस.पाटील यांनी डिजिटल‎ इंडिया चे फायदे सांगितले.

अभिजीत‎‎‎‎‎‎‎‎‎‎ भंडारकर यांनी आधुनिक काळात‎ मोठ्या प्रमाणात डिजिटलायझेशन‎ वाढत असून त्याचा उपयोग या‎ कार्यशाळेच्या माध्यमातून‎ विद्यार्थ्यांना होणार आहे, असे‎ सांगितले. आभार प्रदर्शन विद्यार्थी‎ विकास अधिकारी डॉ.अनिता‎ खेडकर यांनी केले. डॉ.सागराज‎‎‎‎‎‎‎‎‎‎ चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.‎ प्राचार्य डॉ. पी एस पाटील. यांनी‎ विद्यार्थ्यांना या डिजिटल‎ कार्यशाळेच्या भविष्यात उपयोग‎ होईल असे सांगितले. डॉ. अनिता‎ खेडकर व डॉ.जगदीश सोनवणे यांनी‎ नियोजन केले. शेवटी प्रमाणपत्रांचे‎ वितरण करण्यात आले.‎

७९ विद्यार्थ्यांचा‎ कार्यशाळेत सहभाग‎ तृतीय सत्रात डॉ. योगेश‎ तोरवणे यांनी डिजिटल‎ इंडिया व ग्रामीण विकास या‎ विषयावर मार्गदर्शन‎ केले.यांनी. गटचर्चा‎ माध्यमातून डॉ. श्वेता वैद्य‎ यांनी तृतीय सत्राचे‎ सूत्रसंचालन केले. चोपडा‎ येथीलमहाविद्या लयातील‎ वाणिज्य विभागाचे‎ डॉ.सी.आर.देवरे चौथ्या‎ सत्राचे व्याख्याते होते. या‎ कार्यशाळेचा एकूण ७९‎ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.‎

बातम्या आणखी आहेत...