आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान‎:आगीत 250 क्विंटल‎ जळून कापूस खाक‎

चाळीसगाव‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिलखोड येथे कापूस‎ ठेवलेल्या गाेदामाला आग लागून‎ जवळपास अडीचशे क्विंटल‎ कापूस जळून खाक झाल्याची‎ घटना शुक्रवारी दुपारी घडली. या‎ आगीत लाखो रूपयांचे नुकसान‎ झाल्याचे कळते. आगीचे कारण‎ मात्र समजून आले नाही.‎ मालेगाव तालुक्यातील‎ कळवाडीतील कापूस व्यापारी‎ जगदीश शरद दशपुते यांचे‎ पिलखोड येथे उपखेड‎ फाट्याजवळ गाेदाम आहे. या‎ गाेदामात त्यांनी कापूस साठवून‎ ठेवलेला होता. या गोदामातील‎ कापसाला शुक्रवारी दुपारी ४‎ वाजेच्या सुमारास अचानक आग‎ लागली. आग लागल्याचे कळताच‎ आसपासच्या ग्रामस्थांनी धाव घेऊन‎ चाळीसगाव अग्निशामक दलाला‎ माहिती दिली.

अग्निशामक दलासह‎ नागरिकांनी आग विझवण्यासाठी‎ आटोकाट प्रयत्न केले. मात्र,‎ उन्हाळा असल्यामुळे आगीने‎ तत्काळ राैद्ररुप धारण केले.‎ दरम्यान, घटनास्थळी मेहुणबारे‎ पोलिस ठाण्यातील पोलिस‎ उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके व‎ पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन‎ पाहणी व पंचनामा केला. या आगीत‎ २५० क्विंटल कापूस जळून‎ जवळपास २० लाखांचे नुकसान‎ झाल्याची माहिती उपनिरीक्षक‎ चव्हाणके यांनी ‘दिव्य मराठी‘शी‎ बोलताना दिली. या प्रकरणी‎ मेहुणबारे पोलिस ठाण्यात नोंद‎ करण्याची प्रक्रिया सुरू होती.‎ तर‎ कळवाडी येथील व्यापारी जगदीश‎ दशपुते हे परिसरातून कापूस खरेदी‎ करून या गोदामात ठेवत होते.‎

बातम्या आणखी आहेत...